शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

‘अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग, सरकार देशातील जनतेची फसवणूक करतंय’, स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 21:12 IST

Swami Prasad Maurya Statement on Ram Mandir: गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात येथे श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात येथे श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी भव्यदिव्य सोहळ्याची तयारी सुरू आहे. त्याचदरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी या प्राणप्रतिष्ठापनेवरून वादग्रस्त विधान केलं आहे. 

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत. अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम म्हणजे फसवणूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय बौद्ध महोत्सवात आयोजित एका कार्यक्रमामध्ये रामायणामधील एक चौपाई वाचून दाखवत मौर्य यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. त्यात ते म्हणाले की, सरकार अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग रचून तरुण आणि देशातील लोकांची फसवणूक करण्याचं काम करत आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या विधानानंतर संतमहंतांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी सांगितले की, स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्राणप्रतिष्ठापनेचा फसवणूक असा उल्लेख करणं हे दाखवून देत आहे की, ते पूर्णपणे वेडे झाले आहेत. त्यांना वेळ न दवडता वेड्यांच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. मला वाटतं की, त्यांनी चुकून सनातन धर्मामध्ये जन्म घेतला आहे.

स्वामी प्रसाद मौर्य ज्याप्रकारे सनातन धर्माचा सातत्याने अपमान करत आहेत, ते पाहता अखिलेश यादव यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. तसेच मौर्य यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. ही व्यक्ती दररोज गरळ ओकत असते, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा