शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

"PM मोदींच्या नेतृत्वात भारत जगासाठी प्रेरणादायी बनला"; पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवानिमित्त योगींनी केली सेवा पंधरवाड्याची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:07 IST

योगी आदित्यनाथ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सुरू होत आहे, हे आपले भाग्य आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील सर्वात दूरदर्शी आणि लोकप्रिय नेते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी लखनौ येथून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सेवा पंधरवडा-२०२५ ला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि राज्यातील २५ कोटी नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सेवा पखवाडा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत चालेल. या कालावधीत, समाजाला एकत्र आणणारे विविध सर्जनशील उपक्रम राबवले जातील, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सुरू होत आहे, हे आपले भाग्य आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील सर्वात दूरदर्शी आणि लोकप्रिय नेते आहेत. आज संपूर्ण जग पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एका नवीन भारताचे दर्शन करत आहे. जो भारत कधी मागे पडलेला भारत मानला जात होता,  तो आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज जगाला प्रेरणा देत आहे.”

११ वर्षांच्या कामगिरीचं कौतुक -पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील कामगिरीचा पाढा वाचताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “गेल्या ११ वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले आहे. अर्थव्यवस्था, वारसा, पायाभूत सुविधा, गुंतवणूक,रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी विकास आणि जलसंपदा आदी अनेक क्षेत्रांत नवे आदर्श प्रस्थापित केले आहेत. एवढेच नाही तर, गावे, गरीब, शेतकरी, तरुण, महिला, दलित आणि वंचितांना प्राधान्य दिल्याने प्रत्येक नागरिकाच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. म्हणूनच गेल्या ११ वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, असेही योगी म्हणाले.

रामलला ते महाकाल लोकपर्यंत आस्था आणि वारशाचा सन्मान -योगी आदित्यनाथ म्हणाले, वारशाचा आदर आता केवळ घोषणाच नाही तर प्रत्यक्षात दिसत आहे. ५०० वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम लला मंदिर बांधण्यात आले. काशी विश्वनाथ धामचे पुनर्निर्माण जागाचे लक्ष वेधून घेत आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचा कायाकल्प झाला आहेत. महाकाल लोकचे बांधकाम आणि इतर धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण हे नवीन भारताचे वैशिष्ट्य बनले आहे. याशिवाय, बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकर, संत रविदास आणि महर्षी वाल्मिकी यांसारख्या महापुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक सर्जनशील कामे करण्यात आली आहेत, जी सामाजिक न्याय आणि सामाजिक उन्नतीच्या दिशेने मैलाचा दगड ठरली आहेत, असेही योगी म्हणाले. याव्यतिरिक्त, कोरोना काळातील कार्य, आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील कार्य, अशा अनेक गोष्टींवर योगी आदित्यनाथ यांनी यावेली प्रकाश टाकला.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश