शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदींच्या नेतृत्वात भारत जगासाठी प्रेरणादायी बनला"; पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवानिमित्त योगींनी केली सेवा पंधरवाड्याची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:07 IST

योगी आदित्यनाथ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सुरू होत आहे, हे आपले भाग्य आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील सर्वात दूरदर्शी आणि लोकप्रिय नेते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी लखनौ येथून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सेवा पंधरवडा-२०२५ ला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि राज्यातील २५ कोटी नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सेवा पखवाडा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत चालेल. या कालावधीत, समाजाला एकत्र आणणारे विविध सर्जनशील उपक्रम राबवले जातील, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सुरू होत आहे, हे आपले भाग्य आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील सर्वात दूरदर्शी आणि लोकप्रिय नेते आहेत. आज संपूर्ण जग पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एका नवीन भारताचे दर्शन करत आहे. जो भारत कधी मागे पडलेला भारत मानला जात होता,  तो आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज जगाला प्रेरणा देत आहे.”

११ वर्षांच्या कामगिरीचं कौतुक -पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील कामगिरीचा पाढा वाचताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “गेल्या ११ वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले आहे. अर्थव्यवस्था, वारसा, पायाभूत सुविधा, गुंतवणूक,रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी विकास आणि जलसंपदा आदी अनेक क्षेत्रांत नवे आदर्श प्रस्थापित केले आहेत. एवढेच नाही तर, गावे, गरीब, शेतकरी, तरुण, महिला, दलित आणि वंचितांना प्राधान्य दिल्याने प्रत्येक नागरिकाच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. म्हणूनच गेल्या ११ वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, असेही योगी म्हणाले.

रामलला ते महाकाल लोकपर्यंत आस्था आणि वारशाचा सन्मान -योगी आदित्यनाथ म्हणाले, वारशाचा आदर आता केवळ घोषणाच नाही तर प्रत्यक्षात दिसत आहे. ५०० वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम लला मंदिर बांधण्यात आले. काशी विश्वनाथ धामचे पुनर्निर्माण जागाचे लक्ष वेधून घेत आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचा कायाकल्प झाला आहेत. महाकाल लोकचे बांधकाम आणि इतर धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण हे नवीन भारताचे वैशिष्ट्य बनले आहे. याशिवाय, बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकर, संत रविदास आणि महर्षी वाल्मिकी यांसारख्या महापुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक सर्जनशील कामे करण्यात आली आहेत, जी सामाजिक न्याय आणि सामाजिक उन्नतीच्या दिशेने मैलाचा दगड ठरली आहेत, असेही योगी म्हणाले. याव्यतिरिक्त, कोरोना काळातील कार्य, आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील कार्य, अशा अनेक गोष्टींवर योगी आदित्यनाथ यांनी यावेली प्रकाश टाकला.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश