शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळावा ही आम्हीच मागणी केली होती - अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 14:18 IST

चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Akhilesh Yadav: देशाच्या आणि विशेषत: उत्तर प्रदेशच्या राजकारणातील मोठा चेहरा राहिलेल्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांना भारत सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून ही माहिती दिली. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आम्ही यासाठी मागणी केली होती असे म्हटले आहे. 

देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, इथे लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. चौधरी चरणसिंह हे उत्तर प्रदेशचे भूमिपुत्र असून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. आपल्या राजकीय जीवनात प्रथम आमदार बनून त्यांनी संसदीय कामाला सुरुवात केली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी देशासाठी काम केले. आणीबाणीच्या काळात सरकारविरुद्ध त्यांनी उघडपणे भूमिका घेत आणीबाणीला विरोध केला होता. आणीबाणीच्या काळात लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केल्याचे पंतप्रधान मोदींनी पुरस्कार जाहीर करताना म्हटले आहे. 

 चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, खूप खूप अभिनंदन... चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी समाजवादी पार्टीने केली होती. आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांच्याशी चर्चा झाली का, या प्रश्नावर ते म्हणाले की, येथे कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या गोष्टी व्हायला हव्यात त्या सर्व केवळ वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले, "देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधात देखील ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले प्रेम आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेशBharat Ratnaभारतरत्न