शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोण आहेत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 12:46 IST

रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभ मुहूर्तावर झाली

Ram Mandir Ayodhya, Laxmikant Dixit : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी, दुपारी १२ वाजून २९ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त सुमारे ८४ सेकंदांचा होता, त्यात एकूण १२१ पुजार्‍यांच्या पथकाकडून हा विधी केला गेला. त्यात काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह ५ पुजारी गाभाऱ्याच्या आत उपस्थित होते. जाणून घेऊया कोण आहेत लक्ष्मीकांत दीक्षित आणि काय आहे त्यांचे महाराष्ट्राशी कनेक्शन.

कोण आहेत लक्ष्मीकांत दीक्षित?

लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशीमध्ये राहत आहे. त्यांच्या पूर्वजांनीही नागपूर आणि नाशिक या संस्थानांत अनेक धार्मिक विधी केले. लक्ष्मीकांत दीक्षित हे मीरघाट, वाराणसी येथील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. काशीच्या राजाच्या मदतीने सांगवेद महाविद्यालयाची स्थापना झाली. पंडित लक्ष्मीकांत हे काशीतील यजुर्वेदाच्या उत्तम अभ्यासकांमध्ये गणले जातात. पूजेच्या पद्धतीतही त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली. पंडित लक्ष्मीकांत यांचे पूर्वज प्रसिद्ध पंडित गागा भट्ट हे देखील आहेत, ज्यांनी १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.

लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली १२१ पंडितांचा चमू १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठेचा विधी करत आहे. आज पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा करत असताना, मोदींकडून विधी करून घेण्याचा मान बीडचे पुरोहित गजानन ज्योतकर यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने पंतप्रधान मोदी यांनी हे रामललाची विधीवत प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली.

१२१ चमू असलेल्या या पुजाऱ्यांपैकी काशीतील ४० हून अधिक विद्वानांचा समावेश आहे. अयोध्येत आज राम मंदिरात दिवसभर यासंबंधीचे कार्यक्रम चालणार आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीSolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्र