शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 10:42 IST

Lok Sabha elections 2024 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवणार की नाही यासंदर्भात निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर सस्पेन्स कायम आहे. रायबरेलीतून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने आहे. तसेच, प्रियांका गांधी फक्त निवडणुकीत प्रचार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याशिवाय, काँग्रेसचे नेते राहुल गांधीअमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवणार की नाही यासंदर्भात निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. याआधी राहुल गांधी हे अमेठीतून आणि प्रियांका गांधी या रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा होती. या जागांवर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेऊ शकतात, असेही म्हटले जात होते. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, वायनाडमधून राहुल गांधी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. मात्र अमेठीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या पराभवापूर्वी अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. कारण, राहुल गांधी यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

रायबरेली काँग्रेसचा बालेकिल्लारायबरेली ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते. या जागेवरून काँग्रेसकडून सोनिया गांधी निवडणूक लढवत होत्या. मात्र, यावेळी सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळे प्रियांका गांधी येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, २०१९ मध्ये सोनिया गांधी यांनी ही आपली शेवटची लोकसभा निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. 

सोनिया गांधींनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली होती१९९९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी रायबरेलीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली होती. यानंतर सोनिया गांधी एकूण पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. सोनिया गांधींनी रायबरेलीसोबतचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध सोडून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या खूपच भावूक झाल्या होत्या. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४rae-bareli-pcरायबरेलीamethi-pcअमेठीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी