शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुख्यमंत्री योगींच्या 'गिधाड, डुक्कर' विधानावरून विरोधक भडकले, म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 19:49 IST

योगी म्हणाले, कुंभमेळ्यात ज्यांनी जे शोधले, त्यांना ते मिळाले. गिधाडांना मृतदेह दिसले. डुकरांना घाण दिसली, संवेदनशील लोकांना सुंदर चित्र बघायला मिळाले. सज्जनांना सज्जनता दिसली, व्यापाऱ्यांना धंदा दिसला, भाविकांना स्वच्छ व्यवस्था दिसली. ज्यांची नियत आणि दृष्टी जशी होती, त्यांना ते बघायला मिळाले.

उत्तर प्रदेशते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यावर  टीका करणाऱ्या विरोधकांवर थेट विधानसभेतच जोरदार हल्ला चढवला. योगी म्हणाले, कुंभमेळ्यात ज्यांनी जे शोधले, त्यांना ते मिळाले. गिधाडांना मृतदेह दिसले. डुकरांना घाण दिसली, संवेदनशील लोकांना सुंदर चित्र बघायला मिळाले. सज्जनांना सज्जनता दिसली, व्यापाऱ्यांना धंदा दिसला, भाविकांना स्वच्छ व्यवस्था दिसली. ज्यांची नियत आणि दृष्टी जशी होती, त्यांना ते बघायला मिळाले. यानंतर आता मुख्यमंत्री योगींच्या या विधानावरून समाजवादी पक्षाचे नेते भडकले आहेत.

यासंदर्भात विधानसभेत बोलताना विरोधी पक्ष नेते तथा समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते माता प्रसाद पांडे यांनी, "ते (योगी आदित्यनाथ) भानावर नाहीत, असे म्हटले आहे. सपा नेते म्हणाले, अशी भाषा वापरत आहेत, आश्चर्यकारक आहे. काय बोलावे. त्यांची भाषा बिघडली आहे. याशिवाय सपा आमदार रविदास मेहरोत्रा यांनी सरकारची तुलना गिधाड आणि डुकरांशी केली. ते म्हणाले, आम्ही धर्माला मानतो आणि भाजपवाले पाखंड करतात.

दरम्यान, मैनपुरीचे माजी खासदार आणि सपा आमदार तेज प्रताप यादव म्हणाले, सनातनच्या आडून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करतात. एवढी वाईट भाषा देशातील कुठल्याही मुख्यमंत्र्याची नाही. काय भाषा बोलतात मुख्यमंत्री योगी.

आणखी काय म्हणाले होते मुख्यमंत्री योगी? -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधकांना उद्देशून म्हणाले होते, "तुम्ही महाकुंभसंदर्भात म्हणालात की एका विशिष्ट्य जातीच्या व्यक्तीला महाकुंभामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. आम्ही सांगितलं होते, जे लोक सद्भावनेने जात असतील ते जाऊ शकतात. मात्र जर कुणी दुर्भावनेने जात असेल, तर तो अडचणीत येईल. आम्ही लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ होऊ दिला नाही. समाजवादी पक्ष सत्तेत असताना त्यांच्या मुख्यमंत्र्याकडे कुंभचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी एका बिगर-सनातनी व्यक्तीला कुंभमेळ्याचे प्रभारी बनवले होते.

"समाजवादी पक्षाचे लोक महाकुंभवर सातत्याने टीका करत असतात. या लोकांची मानसिकता जगजाहीर आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीचा विरोध करायचा असतो. हे वर्ष भारताच्या संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. पण समाजवादी डॉ. आंबेडकर यांना कधीपासून सन्मान देऊ लागले, हा प्रश्नच आहे. कन्नौज मेडिकल कॉलेजला डॉ. आंबेडकर यांचं नाव देण्यात आले होते, ते कुणी बदलले, हे सर्वांना माहिती आहे," असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथvidhan sabhaविधानसभा