शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:32 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील 'मिशन शक्ती ५.०' या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील 'मिशन शक्ती ५.०' या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी हरवलेले, भरकटलेले असे एकूण १२ मुले, मुली आणि महिलांना शोधून काढले आहे. पोलिसांनी या सर्वांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले असून, आपल्या आप्तजनांना परत भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

हरवलेली मुले मिळाली, कुटुंबियांचे चेहरे फुले!

डीजीपी राजीव कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात 'मिशन शक्ती ५.०' मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी विशेष सर्च ऑपरेशन राबवले गेले.

या अभियानात मिळालेल्या यशामुळे लखनऊच्या जानकीपुरममधील ३ वर्षांच्या मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. याचप्रमाणे, अमरोहाच्या गजरौला येथील एक मुलगा, बरेलीच्या भमोरा येथील ६ वर्षांची मुलगी, बलरामपूरच्या रेहरा बाजार येथील एक मुलगी आणि मुरादाबादच्या रामलीला मैदानात सापडलेल्या एका मुलालाही पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

तीन अल्पवयीन मुलींना परत मिळाले घर!

डीजीपींनी पुढे सांगितले की, या मोहिमेत अनेक भावनाविवश घटना समोर आल्या. संतकबीरनगर येथे घरगुती वाद आणि पैशांच्या तणावामुळे व्यथित झालेली ज्ञानवती देवी नावाच्या महिलेने आपल्या लहान मुलीला पुलावर सोडून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्या महिलेला समजावून नदीत उडी घेण्यापासून थांबवले. त्यांना सुरक्षितपणे चौकीत आणून आई आणि मुलीला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

याशिवाय, बलियाच्या बांसडीहरोड येथे कुटुंबावर रागावून घर सोडून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले. बस्ती रेल्वे स्टेशनवर संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या एका महिलेलाही शोधून तिच्या कुटुंबाकडे सोपण्यात आले. तसेच, महाराजगंज येथे ५ आणि १० वर्षांच्या दोन मुलींना, तर मऊच्या दोहरीघाट परिसरात तीन अल्पवयीन मुलींना शोधून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

आपल्या प्रियजनांना परत भेटल्यामुळे हरवलेल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांनी पोलीस प्रशासनाचे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'मिशन शक्ती' अभियानाचे मनापासून आभार मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mission Shakti 5.0: UP Police Find 12 Missing People in 3 Days

Web Summary : Under Mission Shakti 5.0, Uttar Pradesh police located 12 missing individuals, including children and women, in just three days. Reunions brought immense joy to families. The initiative, directed by CM Yogi, focuses on safety and support.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशMission Shaktiमिशन शक्ती