शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या मृत्यूचं दुःख सहन झालं नाही; जळत्या चितेवर मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 10:48 IST

मित्राच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने जळत्या चितेवर उडी मारून टोकाचं पाऊल उचललं आहे.

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रीचं अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे. मित्राच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने जळत्या चितेवर उडी मारून टोकाचं पाऊल उचललं आहे. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक शाळेपासून दोघे जण एकत्र शिकले आणि एकत्र पुढे गेले, पण शनिवारी एका मित्राचा कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा दुसऱ्याला हे दु:ख सहन झाले नाही. आधी तो स्मशानभूमीवर खूप रडला, नंतर जळत्या चितेवर उडी मारली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना पोलीस स्टेशन नागला खंगार परिसरातील स्वरूप घाटातील आहे. आनंद गौरवचा मित्र अशोक याचा शनिवारी कॅन्सरने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 30 वर्षांची मैत्री संपुष्टात आली तेव्हा गौरवला हा धक्का सहन झाला नाही. अशोकाची चिता जळत असताना आनंदने त्यात उडी घेतली. लोकांना काही समजेपर्यंत आनंद 95 टक्के भाजला होता. घाईगडबडीत त्याला उपचारासाठी आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.

आनंद हा फिरोजाबादच्या गढिया पंचम गावचा रहिवासी आहे. आनंद आणि अशोक यांनी प्राथमिक शाळेतून एकत्र शिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे. अशोक सहा महिन्यांपासून आजारी होता. महिनाभरापूर्वी डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचं सांगितलं. अशोकने शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. यानंतर यमुनेच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिता पेटवून सर्वजण घरी परतायला लागले, पण गौरव तिथेच बसून रडत राहिला. त्यानंतर अचानक त्याने जळत्या चितेत उडी घेतली. चितेला लागलेल्या भीषण आगीमुळे गौरव 95 टक्के भाजला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एसपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, गौरवला त्याच्या मित्राचा मृत्यू सहन झाला नाही आणि त्याने जळत्या चितेत उडी घेतली. अशोकचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि परतायला सुरुवात केली. तेव्हाच गौरवने जळत्या चितेत प्रवेश केला. गंभीररित्या जळालेल्या गौरवला प्रथम फिरोजाबाद आणि नंतर आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती आणि गौरवला ते सहन होत नव्हते. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश