शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीमासोबत अमित यांनाही पाकिस्तानात पाठवणार; करणी सेनेने काढली विमानाची तिकिटे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 18:00 IST

सीमा हैदरला परत पाकिस्तानला पाठवण्यासाठी करणी सेनेने विमानाचे तिकीट काढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे. मात्र, सीमा हैदरबाबतचा गोंधळ थांबताना दिसत नाही. सीमा प्रेमासाठी आली की काही दुसऱ्या हेतूने आली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय काही लोकांकडून व्यक्त केला जात आहे. पण हे अजून सिद्ध झालेले नाही. याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सीमा हैदरची चौकशीही करण्यात येत आहे. 

दरम्यान, सीमा हैदरला परत पाकिस्तानला पाठवण्यासाठी करणी सेनेने विमानाचे तिकीट काढले आहे. यासोबतच सीमा हैदर आणि सचिन यांच्या स्टोरीवर चित्रपट बनवण्याची घोषणा करणाऱ्या अमित जानी यांचेही तिकीटही काढण्यात आले आहे. करणी सेनेने जारी केलेले तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीमा हैदर आणि अमित जानी यांना पाकिस्तानात पाठवण्यासाठी करणी सेनेने ३१ डिसेंबरची तिकिटे जारी केली आहेत. दोघांचीही मुंबईहून बहारीन आणि तेथून कराचीची तिकिटे काढण्यात आली आहेत. सीमा हैदर सध्या सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. 

पाकिस्तानमधील सीमामुळे हिंदू मुलींवर अत्याचार होत असून, त्यांचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे. सीमा चुकीच्या मार्गाने भारतात आली आहे. सीमा रात्री कुठेतरी घरातून निघून जाते, असे करणी सेनेचे गौतम बुद्ध नजर जिल्हाध्यक्ष ठाकूर मनीष सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, ती पाकिस्तानी गुप्तहेर आहे, तिचा सचिनशी काही संबंध नाही, त्यामुळे पाकिस्तानचे तिकीट काढले आहे, असे मनीष सिंह यांनी सांगितले.

सीमा आणि सचिनवर चित्रपट बनवण्याबाबत मनीष सिंह म्हणाले की, "अमित जानी आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. अमित जानी यांना भारतात अभिनयासाठी मुलगी सापडली नाही का? अमित जानी यांचा आधी कुठला चित्रपट आला आहे का? त्यांच्या चित्रपट निर्मितीचा आपल्या मुलांवर चुकीचा परिणाम होईल. प्रत्येकजण अशा प्रकारे भाभी पाकिस्तानात आणू लागेल. सीमा हैदर आणि सचिन यांच्या स्टोरीवर चित्रपट बनू नये."

अंजूबाबत मनीष सिंह म्हणाले?याचबरोबर, भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे तिकीट काढण्याच्या प्रश्नावर मनीष सिंह यांनी सांगितले की, मी तिला परत आणणार नाही. ती कायदेशीररित्या पाकिस्तानात गेली असून तिने पाकिस्तानात कायदेशीर विवाह केला आहे. दरम्यान, राजस्थानची रहिवासी असलेली अंजूही नुकतीच तिच्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. तिथे इस्लाम धर्म स्वीकारून तिने नसरुल्ला नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशKarni Senaकरणी सेनाPakistanपाकिस्तान