शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सीमासोबत अमित यांनाही पाकिस्तानात पाठवणार; करणी सेनेने काढली विमानाची तिकिटे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 18:00 IST

सीमा हैदरला परत पाकिस्तानला पाठवण्यासाठी करणी सेनेने विमानाचे तिकीट काढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे. मात्र, सीमा हैदरबाबतचा गोंधळ थांबताना दिसत नाही. सीमा प्रेमासाठी आली की काही दुसऱ्या हेतूने आली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय काही लोकांकडून व्यक्त केला जात आहे. पण हे अजून सिद्ध झालेले नाही. याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सीमा हैदरची चौकशीही करण्यात येत आहे. 

दरम्यान, सीमा हैदरला परत पाकिस्तानला पाठवण्यासाठी करणी सेनेने विमानाचे तिकीट काढले आहे. यासोबतच सीमा हैदर आणि सचिन यांच्या स्टोरीवर चित्रपट बनवण्याची घोषणा करणाऱ्या अमित जानी यांचेही तिकीटही काढण्यात आले आहे. करणी सेनेने जारी केलेले तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीमा हैदर आणि अमित जानी यांना पाकिस्तानात पाठवण्यासाठी करणी सेनेने ३१ डिसेंबरची तिकिटे जारी केली आहेत. दोघांचीही मुंबईहून बहारीन आणि तेथून कराचीची तिकिटे काढण्यात आली आहेत. सीमा हैदर सध्या सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. 

पाकिस्तानमधील सीमामुळे हिंदू मुलींवर अत्याचार होत असून, त्यांचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे. सीमा चुकीच्या मार्गाने भारतात आली आहे. सीमा रात्री कुठेतरी घरातून निघून जाते, असे करणी सेनेचे गौतम बुद्ध नजर जिल्हाध्यक्ष ठाकूर मनीष सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, ती पाकिस्तानी गुप्तहेर आहे, तिचा सचिनशी काही संबंध नाही, त्यामुळे पाकिस्तानचे तिकीट काढले आहे, असे मनीष सिंह यांनी सांगितले.

सीमा आणि सचिनवर चित्रपट बनवण्याबाबत मनीष सिंह म्हणाले की, "अमित जानी आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. अमित जानी यांना भारतात अभिनयासाठी मुलगी सापडली नाही का? अमित जानी यांचा आधी कुठला चित्रपट आला आहे का? त्यांच्या चित्रपट निर्मितीचा आपल्या मुलांवर चुकीचा परिणाम होईल. प्रत्येकजण अशा प्रकारे भाभी पाकिस्तानात आणू लागेल. सीमा हैदर आणि सचिन यांच्या स्टोरीवर चित्रपट बनू नये."

अंजूबाबत मनीष सिंह म्हणाले?याचबरोबर, भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे तिकीट काढण्याच्या प्रश्नावर मनीष सिंह यांनी सांगितले की, मी तिला परत आणणार नाही. ती कायदेशीररित्या पाकिस्तानात गेली असून तिने पाकिस्तानात कायदेशीर विवाह केला आहे. दरम्यान, राजस्थानची रहिवासी असलेली अंजूही नुकतीच तिच्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. तिथे इस्लाम धर्म स्वीकारून तिने नसरुल्ला नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशKarni Senaकरणी सेनाPakistanपाकिस्तान