शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी संसद कॅन्टीनमध्ये जेवणाचे निमंत्रण दिलेले, बसपा खासदाराने पक्षच सोडला; म्हणाले, मला कुठेच बोलवत नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 12:32 IST

पांडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मायावती यांनी ट्विट केले परंतु पांडे यांचे नाव घेतलेले नाहीय. तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी पूर्ण वेळ दिला आहे का? असे प्रश्न विचारले आहेत.

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही खासदारांना आपल्यासोबत जेवण करण्याचे निमंत्रण दिले होते. यावेळी कॅन्टीनचे बिलही मोदींनी भरले होते. यास काही दिवस होत नाहीत तोच यापैकी एका खासदाराने आपल्या पक्षाचा राजीनामा देत भाजपाची वाट धरली आहे. महत्वाचे म्हणजे राजीनाम्यातच या खासदारांनी मला पक्षाच्या कार्यक्रमांना कुठेच बोलविले जात नसल्याची तक्रार केली आहे. 

उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर मतदारसंघातून बसपाचे खासदार रितेश पांडे यांनी बसपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पांडे आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोदींनी अधिवेशनाच्या अखेरीस ९ खासदारांना कॅन्टीनमध्ये जेवणासाठी बोलविले होते. यामध्ये पांडे यांचा समावेश होता. 

राजीनाम्यामध्ये पांडे यांनी बसपा सुप्रिमो मायवती यांचे विधानसभा आणि लोकसभेत संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. परंतु पक्षाच्या कोणत्याच बैठकांना बोलविले जात नाही, तसेच पक्षाचे नेतृत्व देखील चर्चा करत नाही, असा आरोप केला आहे. मायावती व पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वारंवार प्रयत्न केला होता. परंतु यामध्ये काहीही बदल झाला नाही. या काळात मी माझ्या मतदारसंघातील लोक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी सतत भेट घेत होतो. आता पक्षाला माझ्या सेवेची गरज राहिलेली नाहीय या निष्कर्षावर आलो असल्याचे पांडे यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. 

पांडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मायावती यांनी ट्विट केले परंतु पांडे यांचे नाव घेतलेले नाहीय. बसपा हा राजकीय पक्षाबरोबर डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या स्वाभिमानाच्या ध्येयाला वाहिलेली एक चळवळ देखील आहे. या पक्षाचे धोरण आणि कार्यशैली देशातील भांडवलदार पक्षांपेक्षा वेगळी आहे. हे लक्षात घेऊन पक्षही आपले उमेदवार निवडणुकीत उभे करतो, आता बसपच्या खासदारांनी हा निकष पूर्ण करून स्वत:ला तपासून पाहावे, असे मायावती यांनी म्हटले आहे. 

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पांडे यांच्या राजीनाम्यावरून बसपाच्या खासदारांना इशारा दिला आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी पूर्ण वेळ दिला आहे का? तसेच, पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन केले आहे का? अशा स्थितीत लोकसभेतील बहुतांश खासदारांना तिकीट देणे शक्य आहे का, विशेषत: जेव्हा ते स्वतःच्या हितासाठी इकडे तिकडे फिरताना दिसतात आणि नकारात्मक बातम्यांमध्ये असतात, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा