शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मोदींनी संसद कॅन्टीनमध्ये जेवणाचे निमंत्रण दिलेले, बसपा खासदाराने पक्षच सोडला; म्हणाले, मला कुठेच बोलवत नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 12:32 IST

पांडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मायावती यांनी ट्विट केले परंतु पांडे यांचे नाव घेतलेले नाहीय. तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी पूर्ण वेळ दिला आहे का? असे प्रश्न विचारले आहेत.

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही खासदारांना आपल्यासोबत जेवण करण्याचे निमंत्रण दिले होते. यावेळी कॅन्टीनचे बिलही मोदींनी भरले होते. यास काही दिवस होत नाहीत तोच यापैकी एका खासदाराने आपल्या पक्षाचा राजीनामा देत भाजपाची वाट धरली आहे. महत्वाचे म्हणजे राजीनाम्यातच या खासदारांनी मला पक्षाच्या कार्यक्रमांना कुठेच बोलविले जात नसल्याची तक्रार केली आहे. 

उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर मतदारसंघातून बसपाचे खासदार रितेश पांडे यांनी बसपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पांडे आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोदींनी अधिवेशनाच्या अखेरीस ९ खासदारांना कॅन्टीनमध्ये जेवणासाठी बोलविले होते. यामध्ये पांडे यांचा समावेश होता. 

राजीनाम्यामध्ये पांडे यांनी बसपा सुप्रिमो मायवती यांचे विधानसभा आणि लोकसभेत संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. परंतु पक्षाच्या कोणत्याच बैठकांना बोलविले जात नाही, तसेच पक्षाचे नेतृत्व देखील चर्चा करत नाही, असा आरोप केला आहे. मायावती व पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वारंवार प्रयत्न केला होता. परंतु यामध्ये काहीही बदल झाला नाही. या काळात मी माझ्या मतदारसंघातील लोक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी सतत भेट घेत होतो. आता पक्षाला माझ्या सेवेची गरज राहिलेली नाहीय या निष्कर्षावर आलो असल्याचे पांडे यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. 

पांडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मायावती यांनी ट्विट केले परंतु पांडे यांचे नाव घेतलेले नाहीय. बसपा हा राजकीय पक्षाबरोबर डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या स्वाभिमानाच्या ध्येयाला वाहिलेली एक चळवळ देखील आहे. या पक्षाचे धोरण आणि कार्यशैली देशातील भांडवलदार पक्षांपेक्षा वेगळी आहे. हे लक्षात घेऊन पक्षही आपले उमेदवार निवडणुकीत उभे करतो, आता बसपच्या खासदारांनी हा निकष पूर्ण करून स्वत:ला तपासून पाहावे, असे मायावती यांनी म्हटले आहे. 

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पांडे यांच्या राजीनाम्यावरून बसपाच्या खासदारांना इशारा दिला आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी पूर्ण वेळ दिला आहे का? तसेच, पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन केले आहे का? अशा स्थितीत लोकसभेतील बहुतांश खासदारांना तिकीट देणे शक्य आहे का, विशेषत: जेव्हा ते स्वतःच्या हितासाठी इकडे तिकडे फिरताना दिसतात आणि नकारात्मक बातम्यांमध्ये असतात, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा