शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची असंवेदनशीलता, मुख्यमंत्र्यांच्या भेटीस निघालेल्या महिलांना रेल्वेेतून खाली उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 19:48 IST

लखीमपूर खीरीच्या मैलानी कंधईपूर येथील प्रकरण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांना आपलं गाऱ्हाणं सांगण्यासाठी येथील महिला ट्रेनमधून लखनौकडे ...

लखीमपूर खीरीच्या मैलानी कंधईपूर येथील प्रकरण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांना आपलं गाऱ्हाणं सांगण्यासाठी येथील महिला ट्रेनमधून लखनौकडे निघाल्या होत्या. मात्र, लखनौकडे जाणाऱ्या ४० महिला-पुरुषांना पोलिसांनी अडवले. गोला स्टेशनवर पोलिसांनी जबरदस्तीने या महिलांना खाली उतरवून घरी पाठवले. रेल्वे स्टेशनवर अचानक पोलीस फोर्स पाहून एकच गोंधळ पाहायला मिळाला. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत एसपी यांनी मैलानी एसओ राहुल सिंह यांना बोलावून घेतले. 

कंधईपूर येथील युवक बृजेश पासी याचा मृतदेह १० मे रोजी गावातील आरख बिरादरीच्या एका व्यक्तीच्या घरातच आढळून आला. त्यामुळे, पासी आणि आरख बिरादरीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. १२ जून रोजी दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर, घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी लाठी-काठी उगारत गाववाल्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी, ४८ पेक्षा अधिक लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांकडून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि आपल्यावरील अन्याय मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी कंधईपूर येथील ५ पुरुष आणि ३० महिला लखनौकडे निघाल्या होत्या. मात्र, ज्या रेल्वेमधून ते सर्वजण प्रवास करत होते, त्यांच्या रेल्वेपूर्वीच गोला रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या. सीओ राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्त्वात पोलिसांचा फौजफाटा येथे पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. रेल्वे परिसराला प्रत्यक्षात छावणीचं स्वरुप प्राप्त झालं. 

पोलिसांनी रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या कंधईपूर गावातील प्रवाशांना बाहेर काढलं. पोलिसांनी जबरदस्ती करत या महिलांना ट्रेनमधून खाली उतरवले, त्यापैकी काही महिलांच्या कुशीत लहान मुलेही होती. या स्टेशनवरुन रेल्वे पुढे रवाना झाल्यानंतर पोलिसांनी कंधईपूर गावात या सर्वच प्रवाशांना दोन टाटा मॅजिक गाडीतून घरी पाठवलं. विशेष म्हणजे या रेल्वेतून मैलानी गावचे काही प्रवासी खासगी कामानिमित्त जात होते, आपल्या नातेवाईकांकडे जात असताना त्यांनाही गाडीतून जबरदस्तीने खाली उतरविण्यात आले. पोलिसांनी असंवेदनशीलपणे वर्तणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. रेल्वेतील काही प्रवाशांना नाहक पोलिसांचा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :PoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथlucknow-pcलखनऊ