शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पोलिसांची असंवेदनशीलता, मुख्यमंत्र्यांच्या भेटीस निघालेल्या महिलांना रेल्वेेतून खाली उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 19:48 IST

लखीमपूर खीरीच्या मैलानी कंधईपूर येथील प्रकरण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांना आपलं गाऱ्हाणं सांगण्यासाठी येथील महिला ट्रेनमधून लखनौकडे ...

लखीमपूर खीरीच्या मैलानी कंधईपूर येथील प्रकरण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांना आपलं गाऱ्हाणं सांगण्यासाठी येथील महिला ट्रेनमधून लखनौकडे निघाल्या होत्या. मात्र, लखनौकडे जाणाऱ्या ४० महिला-पुरुषांना पोलिसांनी अडवले. गोला स्टेशनवर पोलिसांनी जबरदस्तीने या महिलांना खाली उतरवून घरी पाठवले. रेल्वे स्टेशनवर अचानक पोलीस फोर्स पाहून एकच गोंधळ पाहायला मिळाला. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत एसपी यांनी मैलानी एसओ राहुल सिंह यांना बोलावून घेतले. 

कंधईपूर येथील युवक बृजेश पासी याचा मृतदेह १० मे रोजी गावातील आरख बिरादरीच्या एका व्यक्तीच्या घरातच आढळून आला. त्यामुळे, पासी आणि आरख बिरादरीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. १२ जून रोजी दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर, घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी लाठी-काठी उगारत गाववाल्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी, ४८ पेक्षा अधिक लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांकडून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि आपल्यावरील अन्याय मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी कंधईपूर येथील ५ पुरुष आणि ३० महिला लखनौकडे निघाल्या होत्या. मात्र, ज्या रेल्वेमधून ते सर्वजण प्रवास करत होते, त्यांच्या रेल्वेपूर्वीच गोला रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या. सीओ राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्त्वात पोलिसांचा फौजफाटा येथे पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. रेल्वे परिसराला प्रत्यक्षात छावणीचं स्वरुप प्राप्त झालं. 

पोलिसांनी रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या कंधईपूर गावातील प्रवाशांना बाहेर काढलं. पोलिसांनी जबरदस्ती करत या महिलांना ट्रेनमधून खाली उतरवले, त्यापैकी काही महिलांच्या कुशीत लहान मुलेही होती. या स्टेशनवरुन रेल्वे पुढे रवाना झाल्यानंतर पोलिसांनी कंधईपूर गावात या सर्वच प्रवाशांना दोन टाटा मॅजिक गाडीतून घरी पाठवलं. विशेष म्हणजे या रेल्वेतून मैलानी गावचे काही प्रवासी खासगी कामानिमित्त जात होते, आपल्या नातेवाईकांकडे जात असताना त्यांनाही गाडीतून जबरदस्तीने खाली उतरविण्यात आले. पोलिसांनी असंवेदनशीलपणे वर्तणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. रेल्वेतील काही प्रवाशांना नाहक पोलिसांचा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :PoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथlucknow-pcलखनऊ