शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सख्या बहिणींचं शेजारील गावच्या सख्ख्या भावांशी लग्न; सासरी पोहचताच नववधू दागिने घेऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:11 IST

दोन सख्या बहिणींनी दोन सख्ख्या भावांशी विवाह करून त्यांचा काटा काढल्याची अनोखी घटना समोर आली आहे.

हरदोई : दोन सख्या बहिणींनी दोन सख्ख्या भावांशी विवाह करून त्यांचा काटा काढल्याची अनोखी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. इथे दोन बहिणींनी कट रचून सख्ख्या भावांना खीरमध्ये मादक पदार्थ मिसळून खायला दिले. यानंतर मौल्यवान वस्तू घेऊन दोघीही फरार झाल्या. एका दलालाने दोन सख्ख्या भावांचे या मुलींशी लग्न लावले होते, ज्यासाठी त्याने ८० हजार आकारले. 

लग्न जुळवण्यासाठी दलालाने संबंधित दोन भावांकडून मोठी रक्कम घेतली. पैसे मिळाल्यानंतर दलालाने एका मंदिरात लग्न लावून दिले. रितीरिवाजानुसार दोन्ही वधू सासरी पोहचल्या आणि पतींना खीर बनवून दिली. खीरमध्ये त्यांनी मादक पदार्थ मिसळून प्यायला दिले. मग दुसऱ्या दिवशी दोघेही भाऊ झोपेतून उठले तर या बहिणींनी घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी संबंधितांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

नववधू दागिने घेऊन फरार प्रदीप पाल (३०) आणि कुलदीप पाल (२७) अशी दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. त्यांची आई अंध आहे. आपल्या मुलांचे लग्न होत नसल्याने कुटुंबीय त्रस्त होते. मग त्यांनी दलालाचा आधार घेत ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, जे त्यांच्या चांगलेच अंगलट आले. प्रदीप दिल्लीत एका खासगी कंपनीत काम करतो, तर कुलदीप गावीच असतो. दलालाने दोन सख्या बहिणींचे फोटो पाठवले. पाल कुटुंबीयांना देखील मुली पसंत पडल्या आणि त्यांनी लग्नासाठी होकार कळवला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार वधूंसाठी सुमारे एक लाख रुपयांचे दागिने बनवले होते. ठरल्याप्रमाणे २२ नोव्हेंबर रोजी एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात लग्न लागल्यानंतर दोन्हीही वधू आणि वर घरी आले. घरी आल्यानंतर नववधूंनी घरच्यांसाठी खीर बनवली. खीर खाल्यानंतर सर्वांना सुस्ती आली आणि सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा नववधूंनी लग्नाचे दागिने, रोख रक्कम आणि घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या. यानंतर दरोडेखोर नववधूंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, सखोल तपास केल्यानंतर आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात येईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न