शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 17:56 IST

पास होऊनही १६ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली.

परिक्षेत अपयश आल्याने टोकाचे पाऊल उचलल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण पास होऊनही १६ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली. तिच्या या निर्णयामागील कारणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दहावीच्या परिक्षेत ९५.३ टक्के गुण मिळाल्यानेही तिचे समाधान झाले नाही आणि तिने मृत्यूला कवटाळले. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात ही घटना घडली. संबंधित तरूणीला दहावीच्या बोर्ड परिक्षेत ६०० पैकी ५७२ गुण मिळाले होते. 

खरे तरे केवळ एक गुण कमी असल्याने ती जिल्ह्यात टॉपर बनू शकली नाही, यामुळे ती नाराज होती. हे स्वप्न अपूर्ण राहिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली अन् एकच खळबळ माजली. मात्र, कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिलेली नाही.

१६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल१६ वर्षीय साक्षी देवी असे मृत तरूणीचे नाव आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, साक्षी फिरोजपूरच्या शाळेत शिकत होती. बोर्ड परीक्षेचा निकाल यावर्षी २० एप्रिल रोजी जाहीर झाला. ज्यामध्ये तिने ६०० पैकी ५७२ गुणांसह ९५.३ टक्के गुण मिळवले. माहितीनुसार, केवळ एक गुण कमी असल्याने ती जिल्ह्यात टॉपर बनली आहे. ती अभ्यासात खूप हुशार होती असे कुटुंबीयांनी सांगितले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेत गौरविण्यात आले. पण टॉप करू न शकल्याने ती गप्प होती. सोमवारी रात्री तिने शेजारील जनावरांच्या शेडशेजारी असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली. सकाळी आई-वडिलांनी लटकलेल्या अवस्थेत तिला पाहताच एकच खळबळ माजली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशexamपरीक्षा