शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ऐकावं ते नवलच! ड्युटी संपली म्हणून मोटरमनने रेल्वे उभी करून केला आराम; ४ तास प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 19:48 IST

उत्तर प्रदेशातील बाराबकी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.

बाराबकी : हे सोशल मीडियाचं जग आहे, इथे कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. अशीच एक अनोखी घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. उत्तर प्रदेशातील बाराबकी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे ड्युटी संपली म्हणून दोन रेल्वे गाड्यांचे मोटरमन गाडी मध्येच थांबवून आराम करण्यासाठी निघून गेले. खरं तर स्थानकापासून दूर असलेल्या या दोन्ही गाड्या चार तास एकाच जागी उभ्या होत्या. यातील एका मोटरमनला वाटले की, रेल्वे व्यवस्थापन काहीतरी मार्ग काढून गाड्या पाठवून देईल, मात्र दुसरा चालक पुढील प्रवासासाठी तयारच न झाल्याने एकच खळबळ माजली.

दोन रेल्वे गाड्या बराच वेळ जागीच उभ्या असल्याने इतर गाड्यांना देखील याचा फटका बसला. प्रवाशांनी आपला संताप व्यक्त करताना रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केले. बाराबकी जिल्ह्यातील बुढवल रेल्वे स्थानकाजवळील या घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. सहरसा एक्सप्रेस प्रवाशांना घेऊन दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला. ही गाडी बुढवल रेल्वे स्थानकाजवळ पोहचताच मोटरमनने विश्रांतीसाठी पळ काढला. बराच वेळ गाडी एकाच जागी थांबल्याने प्रवाशांनी आक्रोश केला. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर जाऊन चौकशी केली असता मोटरमनची ड्युटी संपल्याने गाडी थांबली असल्याचे सांगण्यात आले. 

चार तासांनंतर गाडी रवाना ड्युटी संपल्याने मोटरमन गाडी पुढे नेण्यास नकार देत होते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.  रेल्वे  चालकाची ड्युटी संपल्यावर दुसरा चालक गाडी पुढे नेण्यासाठी पाठवायला हवा होता, मात्र रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक तास गाडी उभी राहिली, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. गाडी एकाच जागी थांबवल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून रेल्वे प्रशासनाने लोको पायलटला बोलावून रेल्वेला अंतिम स्थानकापर्यंत अर्थात दिल्लीपर्यंत पोहचवले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वे