शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 07:09 IST

सनातन रक्षक दलाने केले आंदोलन, आणखी काही मूर्ती हलविण्याची शक्यता

वाराणसी : सनातन रक्षक दल या संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काही मंदिरांतील साईबाबा यांच्या मूर्ती मंगळवारी हटविण्यात आल्या. या संघटनेने बडा गणेश मंदिरातील साईबाबांची मूर्ती तिथून हलवून मंदिराबाहेर आणून ठेवली.

बडा गणेश मंदिराचे मुख्य पुजारी रामू गुरू यांनी सांगितले की, योग्य माहिती नसल्याने साईबाबांच्या मूर्तीची पूजा करण्यात येत होती. ही कृती शास्त्रसंमत नाही. अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी सांगितले की, साईबाबा हे धर्मगुरू, महापुरुष, पीर, अवलिया होऊ शकतात; पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. त्यामुळे वाराणसीच्या मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटविणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरातून चांदपीर (साईबाबा) यांच्या मूर्ती हटविल्या पाहिजेत, असे मी आवाहन करतो. सनातन दलाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले की, काशी म्हणजे वाराणसीमध्ये फक्त भगवान शंकर या सर्वोच्च देवतेचीच पूजा व्हायला हवी. (वृत्तसंस्था)

भक्तांच्या भावनांचा आदर करून वाराणसीतील दहा मंदिरांतून साईबाबा यांच्या मूर्ती हटविण्यात आल्या. येत्या काही दिवसांत अगस्त्यकुंड, भुतेश्वर मंदिरातील साईबाबा मूर्तीही तिथून हलविण्यात येतील, असे सनातन रक्षक दलाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले.

‘साईबाबा मूर्ती हटविणे ही अयोग्य कृती’ वाराणसी येथील संत रघुवरदास नगर येथील साईबाबा मंदिराचे पुजारी समर घोष यांनी सांगितले की, स्वत:ला आता सनातनी म्हणवून घेणाऱ्या लोकांनीच पूर्वी मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्तींची स्थापना केली होती. आता तेच या मूर्ती हटविण्याचे काम करत आहेत. देव कोणत्याही रूपात दिसू शकतो. त्यामुळे साईबाबांच्या मूर्ती मंदिरांतून हटविणे ही चुकीची कृती आहे. त्यामुळे समाजातील असंख्य भाविकांच्या भावना दुखावतात. 

टॅग्स :saibabaसाईबाबा