शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

बाधित राज्यांना मदतीचा हात; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पाठवली हिमाचल, उत्तराखंड आणि पंजाबला मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:48 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी सहाराणपूर येथून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी ४८ ट्रक भरून मदत सामग्री पाठवली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी सहाराणपूर येथून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी ४८ ट्रक भरून मदत सामग्री पाठवली. या मदतीला हिरवा झेंडा दाखवताना मुख्यमंत्री म्हणाले की, ही मदत सामग्री फक्त वस्तू नसून, ती मानवी संवेदनशीलतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या संकटाच्या काळात उत्तर प्रदेशची २५ कोटी जनता या तिन्ही राज्यांतील आपल्या बांधवांच्या पाठीशी उभी आहे.

यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला प्रत्येकी ५ कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदतही जाहीर केली. या मदतीचे ट्रक घेऊन उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि आमदार पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत.

'एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या दृष्टिकोनातून विकास होत आहे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सरकारचे प्रयत्न प्रभावी ठरत आहेत. एनडीआरएफ, आपदामित्र आणि स्थानिक पोलीस यांच्यासह अनेक संस्था मदतकार्यात सक्रियपणे सहभागी आहेत.

वेळेवर उपाययोजनांमुळे उत्तर प्रदेश सुरक्षित

योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, या वर्षी पूर ही उत्तर प्रदेशसाठी मोठी समस्या ठरली असती, पण वेळेवर केलेल्या उपाययोजनांमुळे राज्य या आपत्तीतून वाचले आहे. यामुळे मोठी वित्तहानी टळली आहे. नदीकाठच्या भागात पुराचे पाणी साचले, पण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.

पूरग्रस्तांना तात्काळ मदत

या आपत्तीत ज्यांचे घर उद्धवस्त झाले, त्यांना नवीन घर बांधण्यासाठी सरकार मदत करत आहे. तसेच, ज्यांची जमीन किंवा घर पाण्यात वाहून गेले आहे, अशा कुटुंबांना जमीन आणि घर बांधण्यासाठी पैसे दिले जात आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या लोकांना सुरक्षित छावण्यांमध्ये हलवले जात आहे आणि त्यांच्यासाठी अन्न, पाणी, मुलांसाठी दूध आणि जनावरांसाठी चारा यांची व्यवस्था केली जात आहे.

आपत्कालीन परिस्थितीत खबरदारी घ्या!

मुख्यमंत्री योगी यांनी जनतेला आवाहन केले की, आपत्कालीन परिस्थितीत सतर्कता आणि खबरदारी खूप महत्त्वाची आहे. दूषित पाण्यामुळे आजार पसरू शकतात, त्यामुळे पाणी उकळून प्यावे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये, जेणेकरून डेंग्यू किंवा मलेरियाचे डास वाढणार नाहीत. जर साप किंवा इतर विषारी प्राण्याने चावा घेतला, तर तातडीने डॉक्टरांकडे जावे. प्रत्येक सामुदायिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात लसीकरण उपलब्ध आहे. कुत्रा किंवा इतर कोणत्याही जंगली प्राण्याने चावा घेतल्यास, अँटी-रेबीज लस घ्यावी. बचाव करणे हाच सर्वात मोठा उपाय आहे.

मदत सामग्रीमध्ये काय-काय सामील?

उत्तर प्रदेशच्या सरकारकडून पाठवण्यात आलेल्या मदत सामग्रीच्या ४८ ट्रकमध्ये विविध आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येक पॅकेटमध्ये १० किलो गहू, १० किलो तांदूळ, २ किलो तूर डाळ, १० किलो बटाटे, १८ लिटरची बादली, २ अंघोळीचे साबण, मेणबत्ती, माचिस, बिस्किटांचे १० पाकीट, १ किलो साखर, २ किलो हरभरे, २ किलो चणे, अडीच किलो लाह्या, १ किलो मोहरीचे तेल, १ किलो मीठ, तसेच अन्य काही वस्तू आहेत. याव्यतिरिक्त, सॅनिटरी पॅड, कपडे धुण्याचे साबण, टॉवेल, सुती कपडे, डिस्पोजल बॅग, मग, आणि डेटॉलचाही समावेश आहे. ही सर्व सामग्री पूरग्रस्त कुटुंबांना देण्यात आली आहे, जेणेकरून संकटाच्या काळात त्यांना मदत होईल.

टॅग्स :floodपूरPunjabपंजाबHimachal Pradeshहिमाचल प्रदेशUttarakhandउत्तराखंडyogi adityanathयोगी आदित्यनाथ