शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 09:18 IST

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन आणि गर्मीने कहर केला आहे. लोक गर्मीमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे घरातून बाहेर पडणेही अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा त्रास जाणवत आहे. यातच, उत्तर प्रदेशातील बलिया येथील उष्णता आणि गर्मीमुळे रुग्ण आणि मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. 

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यांपैकी 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, हा आकडा केवळ जिल्हा रुग्णालयातील आहे. यावरूनच संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

आजमगड विभागातील अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ बीपी तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढला आहे. या मागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी लखनऊवरून एक चमू येत आहे. हाचा शोध घेईल. याशिवाय, जेव्हा उष्णता अथवा थंडी अधिक असते तेव्हा श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण, मधुमेही, रक्तदाबाची समस्या असलेले रुग्ण यांना धोका वाढतो. त्यामुळे तापमान वाढीचा अशा रुग्णांवर परिणाम होऊ शकतो. कदाचित यामुळेही मृत्यू होत असावेत, अशेही ते म्हणाले.

तीन दिवसांत 400 रुग्ण दाखल - यासंदर्भात बोलताना प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. के. यादव म्हणणे. जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास चारशे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSun strokeउष्माघातhospitalहॉस्पिटल