शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

लग्नमांडवातून पळाला नवरेदव; नवरीने बसमधून पकडून आणले, मग लग्न लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:51 IST

बरेली जिल्ह्यातील या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे

बरेली - जवळपास अडीच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर युवक आणि युवतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी, लग्नाची सर्वच तयारी झाली, लग्नकार्यासाठी मंडप सजला, विधिव्रत तयारीही पूर्ण झाली. मात्र, ऐनवेळी नवरेदवाचा मूड बदलला आणि तो लग्नमांडवातून पळून गेला. खूप वेळ झाला तरी नवरदेव आला नसल्याने स्वत: नवरी मुलगीच नवरदेवाच्या शोधासाठी निघाली. तिकडे बसमधून नवरदेव गाव सोडायच्या तयारीत असतानाच नवरीने त्याला पकडले. त्यानंतर, वापस आणून दोघांचा विधिव्रत लग्नसोहळा संपन्न झाला.

बरेली जिल्ह्यातील या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्नमंडपातून पळून गेलेल्या नवरदेवाला नवरी मुलीने पकडून आणले, त्यानंतर जवळील मंदिरात जाऊन लग्नही लावले. जवळपास २ तास हे लग्नाचे नाटक सुरू होते. लग्नासाठी आलेली पाहुणेमंडळीही हा तमाशा पाहात होती. मात्र, धाडसी मुलीने लग्नाचे ७ फेरे घेतल्यानंतरच मुलाचा पाठलाग सोडून दिला.

मुलगा आणि मुलीचे गेल्या २-३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे, मुलीच्या कुटुंबीयांना मुलीला लग्न करण्याचे सूचवले. रविवारी घरगुती सहमतीतून मुलीच्या कुटुंबीयाने भुतेश्वरनाथ मंदिरात लग्नमंडप सजवला होता. त्यासाठी सर्व तयारीही पूर्ण केली. नवरी नटून-थटून बसली, नवरदेवाची वाट पाहिली जात होती. मात्र, तो येईनाच गेल्याने मुलीने त्याला फोन लावून चौकशी केली. त्यावेळी, मुलगा पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे मुलीला समजले. त्यामुळे, तिने तात्काळ मंडपातून उठून नवऱ्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी, लग्नस्थळापासून २० किमी दूरवर बसमध्ये बसून निघणार तेवढ्यात मुलीने नवरदेवाला पकडले. मी माझ्या आईला घेऊन येतो, असे तो म्हणाला. मात्र, मुलीने मुलाचे काहीही ऐकले नाही. याउलट मंदिरात आणून दोघांचे लग्न लावण्यात आले. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश