शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

लग्नमांडवातून पळाला नवरेदव; नवरीने बसमधून पकडून आणले, मग लग्न लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:51 IST

बरेली जिल्ह्यातील या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे

बरेली - जवळपास अडीच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर युवक आणि युवतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी, लग्नाची सर्वच तयारी झाली, लग्नकार्यासाठी मंडप सजला, विधिव्रत तयारीही पूर्ण झाली. मात्र, ऐनवेळी नवरेदवाचा मूड बदलला आणि तो लग्नमांडवातून पळून गेला. खूप वेळ झाला तरी नवरदेव आला नसल्याने स्वत: नवरी मुलगीच नवरदेवाच्या शोधासाठी निघाली. तिकडे बसमधून नवरदेव गाव सोडायच्या तयारीत असतानाच नवरीने त्याला पकडले. त्यानंतर, वापस आणून दोघांचा विधिव्रत लग्नसोहळा संपन्न झाला.

बरेली जिल्ह्यातील या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्नमंडपातून पळून गेलेल्या नवरदेवाला नवरी मुलीने पकडून आणले, त्यानंतर जवळील मंदिरात जाऊन लग्नही लावले. जवळपास २ तास हे लग्नाचे नाटक सुरू होते. लग्नासाठी आलेली पाहुणेमंडळीही हा तमाशा पाहात होती. मात्र, धाडसी मुलीने लग्नाचे ७ फेरे घेतल्यानंतरच मुलाचा पाठलाग सोडून दिला.

मुलगा आणि मुलीचे गेल्या २-३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे, मुलीच्या कुटुंबीयांना मुलीला लग्न करण्याचे सूचवले. रविवारी घरगुती सहमतीतून मुलीच्या कुटुंबीयाने भुतेश्वरनाथ मंदिरात लग्नमंडप सजवला होता. त्यासाठी सर्व तयारीही पूर्ण केली. नवरी नटून-थटून बसली, नवरदेवाची वाट पाहिली जात होती. मात्र, तो येईनाच गेल्याने मुलीने त्याला फोन लावून चौकशी केली. त्यावेळी, मुलगा पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे मुलीला समजले. त्यामुळे, तिने तात्काळ मंडपातून उठून नवऱ्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी, लग्नस्थळापासून २० किमी दूरवर बसमध्ये बसून निघणार तेवढ्यात मुलीने नवरदेवाला पकडले. मी माझ्या आईला घेऊन येतो, असे तो म्हणाला. मात्र, मुलीने मुलाचे काहीही ऐकले नाही. याउलट मंदिरात आणून दोघांचे लग्न लावण्यात आले. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश