शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमांडवातून पळाला नवरेदव; नवरीने बसमधून पकडून आणले, मग लग्न लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:51 IST

बरेली जिल्ह्यातील या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे

बरेली - जवळपास अडीच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर युवक आणि युवतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी, लग्नाची सर्वच तयारी झाली, लग्नकार्यासाठी मंडप सजला, विधिव्रत तयारीही पूर्ण झाली. मात्र, ऐनवेळी नवरेदवाचा मूड बदलला आणि तो लग्नमांडवातून पळून गेला. खूप वेळ झाला तरी नवरदेव आला नसल्याने स्वत: नवरी मुलगीच नवरदेवाच्या शोधासाठी निघाली. तिकडे बसमधून नवरदेव गाव सोडायच्या तयारीत असतानाच नवरीने त्याला पकडले. त्यानंतर, वापस आणून दोघांचा विधिव्रत लग्नसोहळा संपन्न झाला.

बरेली जिल्ह्यातील या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्नमंडपातून पळून गेलेल्या नवरदेवाला नवरी मुलीने पकडून आणले, त्यानंतर जवळील मंदिरात जाऊन लग्नही लावले. जवळपास २ तास हे लग्नाचे नाटक सुरू होते. लग्नासाठी आलेली पाहुणेमंडळीही हा तमाशा पाहात होती. मात्र, धाडसी मुलीने लग्नाचे ७ फेरे घेतल्यानंतरच मुलाचा पाठलाग सोडून दिला.

मुलगा आणि मुलीचे गेल्या २-३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे, मुलीच्या कुटुंबीयांना मुलीला लग्न करण्याचे सूचवले. रविवारी घरगुती सहमतीतून मुलीच्या कुटुंबीयाने भुतेश्वरनाथ मंदिरात लग्नमंडप सजवला होता. त्यासाठी सर्व तयारीही पूर्ण केली. नवरी नटून-थटून बसली, नवरदेवाची वाट पाहिली जात होती. मात्र, तो येईनाच गेल्याने मुलीने त्याला फोन लावून चौकशी केली. त्यावेळी, मुलगा पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे मुलीला समजले. त्यामुळे, तिने तात्काळ मंडपातून उठून नवऱ्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी, लग्नस्थळापासून २० किमी दूरवर बसमध्ये बसून निघणार तेवढ्यात मुलीने नवरदेवाला पकडले. मी माझ्या आईला घेऊन येतो, असे तो म्हणाला. मात्र, मुलीने मुलाचे काहीही ऐकले नाही. याउलट मंदिरात आणून दोघांचे लग्न लावण्यात आले. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश