शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात मुलावर चुकीचे उपचार, हात कापण्याची वेळ; वडिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:32 IST

लखनौमध्ये दाखवल्यावर तेथील डॉक्टरांनी सांगितले की मुलाचा हात कापावा लागेल.

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका खासगी रुग्णालयात चुकीच्या औषधामुळे एका मुलाच्या हाताची अवस्था गंभीर झाल्य़ाचा आरोप करण्यात आला आहे. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोग्य विभागाच्या पथकाने तपास सुरू केला आहे. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये मुलाच्या उपचारात निष्काळजीपणा करण्यात आला होता, त्यामुळे मुलाच्या हाताला संसर्ग झाला. लखनौमध्ये दाखवल्यावर तेथील डॉक्टरांनी सांगितले की मुलाचा हात कापावा लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सिटी कोतवाली परिसरातील नेहरू क्रॉसिंगजवळील सत्यम हॉस्पिटलशी संबंधित आहे. लालगंज येथील रहिवासी असलेल्या सुरेंद्र शर्मा यांनी आपल्या मुलाला येथे दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याला न्यूमोनिया म्हणून उपचार सुरू केले आणि ड्रिप चढवण्यासाठी हाताला वीगो लावला. वीगो लावल्यामुळे मुलगा खूप अस्वस्थ झाला. वडील सुरेंद्र यांच्या हे लक्षात आलं. 

वडिलांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे तक्रार केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरेंद्रच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्यांनी स्वत: वीगो काढून टाकले. यानंतर मुलाच्या हाताला जखम झाल्याची दिसून आले. सुरेंद्र यांनी मुलाला डिस्चार्ज दिल्यानंतर लखनौमध्ये दाखवले, तेथे डॉक्टरांनी सांगितले की, मुलाला गँगरीन झालं आहे, त्याचा हात कापावा लागेल. यानंतर सुरेंद्रने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, त्यांनी आरोग्य विभागाला योग्य उपचार करण्याचा सल्ला देत चौकशी करण्याचे निर्देश दिले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सीएमओने चौकशी समिती स्थापन केली, जी चौकशीसाठी सत्यम हॉस्पिटलमध्ये पोहोचली. टीमने तिथल्या हॉस्पिटलच्या ऑपरेटरशी अनेक तास चर्चा केली. सुरेंद्र शर्मा म्हणाले की, मी डीएम कार्यालयात आलो आहे. मुलाला ताप आला होता. 13 जून रोजी सत्यम रुग्णालयात दाखल केले. वीगो चुकीच्या ठिकाणी लावल्याने संसर्ग पसरतो. आम्ही बोललो तेव्हा ते योग्य होईल असे सांगण्यात आले. ते योग्य होणार नाही असे वाटल्यावर एम्सला गेलो. हात कापावा लागेल, असे एम्समध्ये सांगण्यात आले. त्याच्यावर उपचार करा, जी काही कारवाई होईल, ती करू, असे डीएम म्हणाले.

रुग्णालयाचे संचालक डॉ. आशुतोष सिंह यांनी सांगितले की, मुलाला न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता, त्याचे वजन खूपच कमी होते. येथून उपचार घेतले. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला स्वतःच्या जबाबदारीवर घेतले आणि 10 दिवसांनंतर आता ते रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. त्याची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे. तपासात सत्य समोर येईल, तेही तपास अहवालाची वाट पाहणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल