शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

२०१४ मध्ये आले २०२४ मध्ये निघून जातील, अखिलेश यादव यांचा मोदींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 5:30 PM

Akhilesh Yadav: भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल.

आजपासून सुरू झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी २०१४ मध्ये सत्तेत आले होते. आता २०१४ मध्ये ते निघून जातील. उत्तर प्रदेश हा देशातील सर्वात मोठं राज्य आहे. येथे लोकसभेच्या ८० जागा आहेत. भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल.

गुरुवारी मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीबाबत अखिलेश यादव म्हणाले की, इंडियाच्या, आघाडीची बैठक होत आहे. याआधी पाटणा आणि बंगळुरूमध्ये बैठका झाल्या होत्या. ही आघाडी आकारास येईल, असा संपू्ण देशवासियांना विश्वास आहे. भाजपा सत्तेतून बाहेर जाईल. त्यांच्या सरकारने देशाचा विश्वासघात केला आहे. मोदींना आज रक्षाबंधनादिवशी महिलांची आठवण आली आहे. किंमत २०० रुपयांनी घटवली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाव आणखी कमी झाले असते तर अधिक दिलासा मिळाला असता.

उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी केलेल्या विधानावर पलटवार करताना अखिलेश यादव म्हणाले की, ते उपमुख्यमंत्रिपदासाठी पात्र नव्हते. ज्या पदावर ते बसले आहेत त्याचा सन्मान करावा लागेल. आरोग्य विभागात सुधारणा करण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते त्यांचा विभाग सोडून प्रत्येक आजारावर लक्ष देत आहेत. त्यांनी आपला विभाग आजारी पाडला आहे. जर कुणी हा विभाग दुरुस्त करू म्हटलं तरी १० वर्षांत करता येणार नाही. आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर लूट, भ्रष्टाचार आणि बेईमानी झालेली आहे. रुग्णालयात कुठल्याही गरिबावर उपचार होत नाही आहेत.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा