शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

२०१४ मध्ये आले २०२४ मध्ये निघून जातील, अखिलेश यादव यांचा मोदींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:30 IST

Akhilesh Yadav: भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल.

आजपासून सुरू झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी २०१४ मध्ये सत्तेत आले होते. आता २०१४ मध्ये ते निघून जातील. उत्तर प्रदेश हा देशातील सर्वात मोठं राज्य आहे. येथे लोकसभेच्या ८० जागा आहेत. भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल.

गुरुवारी मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीबाबत अखिलेश यादव म्हणाले की, इंडियाच्या, आघाडीची बैठक होत आहे. याआधी पाटणा आणि बंगळुरूमध्ये बैठका झाल्या होत्या. ही आघाडी आकारास येईल, असा संपू्ण देशवासियांना विश्वास आहे. भाजपा सत्तेतून बाहेर जाईल. त्यांच्या सरकारने देशाचा विश्वासघात केला आहे. मोदींना आज रक्षाबंधनादिवशी महिलांची आठवण आली आहे. किंमत २०० रुपयांनी घटवली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाव आणखी कमी झाले असते तर अधिक दिलासा मिळाला असता.

उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी केलेल्या विधानावर पलटवार करताना अखिलेश यादव म्हणाले की, ते उपमुख्यमंत्रिपदासाठी पात्र नव्हते. ज्या पदावर ते बसले आहेत त्याचा सन्मान करावा लागेल. आरोग्य विभागात सुधारणा करण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते त्यांचा विभाग सोडून प्रत्येक आजारावर लक्ष देत आहेत. त्यांनी आपला विभाग आजारी पाडला आहे. जर कुणी हा विभाग दुरुस्त करू म्हटलं तरी १० वर्षांत करता येणार नाही. आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर लूट, भ्रष्टाचार आणि बेईमानी झालेली आहे. रुग्णालयात कुठल्याही गरिबावर उपचार होत नाही आहेत.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा