शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

२०१४ मध्ये आले २०२४ मध्ये निघून जातील, अखिलेश यादव यांचा मोदींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:30 IST

Akhilesh Yadav: भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल.

आजपासून सुरू झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी २०१४ मध्ये सत्तेत आले होते. आता २०१४ मध्ये ते निघून जातील. उत्तर प्रदेश हा देशातील सर्वात मोठं राज्य आहे. येथे लोकसभेच्या ८० जागा आहेत. भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल.

गुरुवारी मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीबाबत अखिलेश यादव म्हणाले की, इंडियाच्या, आघाडीची बैठक होत आहे. याआधी पाटणा आणि बंगळुरूमध्ये बैठका झाल्या होत्या. ही आघाडी आकारास येईल, असा संपू्ण देशवासियांना विश्वास आहे. भाजपा सत्तेतून बाहेर जाईल. त्यांच्या सरकारने देशाचा विश्वासघात केला आहे. मोदींना आज रक्षाबंधनादिवशी महिलांची आठवण आली आहे. किंमत २०० रुपयांनी घटवली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाव आणखी कमी झाले असते तर अधिक दिलासा मिळाला असता.

उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी केलेल्या विधानावर पलटवार करताना अखिलेश यादव म्हणाले की, ते उपमुख्यमंत्रिपदासाठी पात्र नव्हते. ज्या पदावर ते बसले आहेत त्याचा सन्मान करावा लागेल. आरोग्य विभागात सुधारणा करण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते त्यांचा विभाग सोडून प्रत्येक आजारावर लक्ष देत आहेत. त्यांनी आपला विभाग आजारी पाडला आहे. जर कुणी हा विभाग दुरुस्त करू म्हटलं तरी १० वर्षांत करता येणार नाही. आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर लूट, भ्रष्टाचार आणि बेईमानी झालेली आहे. रुग्णालयात कुठल्याही गरिबावर उपचार होत नाही आहेत.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा