शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माकडांनी ३० दिवसांत ३५ लाखांची साखर खाल्ली? कारखान्याच्या ऑडिटमध्ये खुलासा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:44 IST

या घोटाळ्याप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर गोदाम किपरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलीगड : उत्तर प्रदेशातील अलीगड येथील किसान साथा साखर कारखान्यात ११०० क्विंटल साखरेचा घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. जवळपास ३५ लाख रुपयांची साखर पावसात वाहून गेली आणि माकडांनी खाल्ल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, साथा हा साखर कारखाना २६ महिन्यांपासून बंद आहे. आता या घोटाळ्याप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर गोदाम किपरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माकडांनी ३० दिवसांत ३५ लाख रुपयांची ११०० क्विंटल साखर खाल्ल्याचे रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आले आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात व्यवस्थापक आणि लेखा अधिकाऱ्यासह सहा जण दोषी आढळले. त्यानंतर सरकारने त्याची चौकशी केली. तपास अहवालानुसार प्रभारी गोदाम किपर आणि गोदाम किपर यांच्याविरुद्ध जवां पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑडिट टीमने गेस्ट हाऊसमध्ये बसून हवेत ऑडिटिंग केले आहे. साखरेचे साठा जेवढा कमी सांगण्यात येत आहे, तेवढा सारखरेचा साठा कमी नाही आहे. कारखान्याच्या आतील गोदामाचे शटर आणि छत तुटले आहे. छतावरून पाणी गळते. तसेच, माकडांनीही साखर खाल्ली आहे. त्यामुळे गोदामात साखर पसरली आहे, असे साखर कारखान्याच्या गोदाम किपरने सांगितले.

याचबरोबर, गोदामात पावसाचे पाणी छतावरून खाली येते, त्यामुळे ५२८ क्विंटल साखर कमी झाली आहे. ऑडिट टीमद्वारे जो ११०० क्विंटल साखर कमी झाल्याच्या रिपोर्ट आला आहे, तो चुकीचा आहे. तसेच, गोदामाच्या इमारतीची दुरवस्था आणि देखभाल भत्ता याबाबत जिल्हा प्रशासनाला अनेकवेळा पत्रे लिहिली, मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे समस्या सुटलेली नाही, असेही गोदाम किपरने सांगितले.

दरम्यान, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, येथे माकडांची दहशत असून २०२० नंतर येथे साखरेचे उत्पादन होत नाही. साखर कारखान्याची देखभालही झालेली नाही. तसेच, गोदामातून साखर कशी कमी झाली ते माहीत नाही, पण माकडे तेवढी साखर खाऊ शकत नाहीत, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSugar factoryसाखर कारखाने