शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

ठरले! अखिलेश यादव भारत न्याय यात्रेत सहभागी होणार; सपाने निमंत्रण स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 21:07 IST

Bharat Jodo Nyay Yatra: मानापमानाच्या नाट्यानंतर अखेर अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधीसोबत दिसणार आहेत.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असतानाच समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागावाटपाचा तिढा सुटला. समाजवादी पक्षाने काँग्रेसला १७ जागा देण्यास मान्यता दिली. यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत.

काँग्रेस नेत्यांनी समजावादी पक्षाला भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाला मान देत अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. भारत जोडो यात्रेत आम्ही सहभागी होणार आहोत. लवकरच काँग्रेसचा याबाबत एक विस्तृत कार्यक्रम येणार आहे. त्यानंतर आगरा येथे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, असे अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

प्रियांका गांधीची भूमिका ठरली महत्त्वाची

तत्पूर्वी, प्रियांका गांधी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर बोलून १७ जागांवर शिक्कामोर्तब केले. उर्वरित दोन जागा बदलण्यास सांगितले. अखिलेश यादव यांनी त्यांची यादी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवली होती. त्यानंतर खरगे यांनी अखिलेश यांना सांगितले होते की, राहुल गांधी यांना मुरादाबाद आणि बिजनौर या दोन जागा हव्या आहेत. त्यानंतर अखिलेश यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखिलेश यांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग घेतला नाही. अखेर प्रियांका गांधी यांनी अखिलेश यांच्याशी बोलून या आघाडीवर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील उत्तर प्रदेशमधील जागावाटपाचा अडथळा दूर झाला. दोन्ही पक्षांनी इंडिया आघाडीअंतर्गत जागावाटपाची औपचारिक घोषणा केली. या अंतर्गत राज्यातील ८० जागांपैकी काँग्रेस रायबरेली आणि अमेठीसह १७ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAkhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेस