शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 20:12 IST

Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असल्याचे सांगत अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली.

Akhilesh Yadav: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला पराभूत करण्याचा विरोधकांनी चंग बांधला असून, इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीत सामील असलेले विरोधी पक्ष आपापल्या भागात जोर लावताना दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना २०२४ मध्ये भाजप जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे. 

सन २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले होते. आता २०२४ मध्ये भाजप सरकार जाणार आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. आजही जनतेचे प्रश्न तसेच आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, हे भाजपने सांगावे? सरकारचे म्हणणे आहे की ४० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. आता त्यांची स्थिती काय आहे? किती गुंतवणूक केली आहे? आम्ही ऐकले आहे की ज्या लोकांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती त्यांचा शोध अधिकारी घेत आहेत, असा खोचक टोला अखिलेश यादव यांनी लगावला.

आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बही बनवला नाही

बुंदेलखंडच्या या लोकांना हे समजले की, भाजपने मोठी स्वप्ने दाखवली आहेत. दिल्लीतील लोक आले आणि म्हणाले की, उत्तर प्रदेशात मिसाईल तयार केले जाईल. १० वर्षे मागे वळून पाहिले तर ज्यांनी टँक, बॉम्ब बनवण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बसुद्धा तयार केला नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, सामाजिक न्यायाची लढाई केवळ जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हाच पूर्ण होईल. लोकांना हक्क मिळतील. हा लढा मोठा आहे. मागास आणि दलितांना त्यांचे हक्क द्यावे लागतील. लोकांना सामाजिक न्यायाचा फायदा होईल. आम्ही फक्त पाल, बघेल आणि धनगर समुदायाच्या हितासाठी लढा देणार नाही, परंतु या संदर्भात आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून लोकांना लोकसंख्येनुसार त्यांचे हक्क दिले जाऊ शकतात, असे अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा