शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 20:12 IST

Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असल्याचे सांगत अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली.

Akhilesh Yadav: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला पराभूत करण्याचा विरोधकांनी चंग बांधला असून, इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीत सामील असलेले विरोधी पक्ष आपापल्या भागात जोर लावताना दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना २०२४ मध्ये भाजप जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे. 

सन २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले होते. आता २०२४ मध्ये भाजप सरकार जाणार आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. आजही जनतेचे प्रश्न तसेच आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, हे भाजपने सांगावे? सरकारचे म्हणणे आहे की ४० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. आता त्यांची स्थिती काय आहे? किती गुंतवणूक केली आहे? आम्ही ऐकले आहे की ज्या लोकांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती त्यांचा शोध अधिकारी घेत आहेत, असा खोचक टोला अखिलेश यादव यांनी लगावला.

आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बही बनवला नाही

बुंदेलखंडच्या या लोकांना हे समजले की, भाजपने मोठी स्वप्ने दाखवली आहेत. दिल्लीतील लोक आले आणि म्हणाले की, उत्तर प्रदेशात मिसाईल तयार केले जाईल. १० वर्षे मागे वळून पाहिले तर ज्यांनी टँक, बॉम्ब बनवण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बसुद्धा तयार केला नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, सामाजिक न्यायाची लढाई केवळ जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हाच पूर्ण होईल. लोकांना हक्क मिळतील. हा लढा मोठा आहे. मागास आणि दलितांना त्यांचे हक्क द्यावे लागतील. लोकांना सामाजिक न्यायाचा फायदा होईल. आम्ही फक्त पाल, बघेल आणि धनगर समुदायाच्या हितासाठी लढा देणार नाही, परंतु या संदर्भात आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून लोकांना लोकसंख्येनुसार त्यांचे हक्क दिले जाऊ शकतात, असे अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा