शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 20:12 IST

Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असल्याचे सांगत अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली.

Akhilesh Yadav: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला पराभूत करण्याचा विरोधकांनी चंग बांधला असून, इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीत सामील असलेले विरोधी पक्ष आपापल्या भागात जोर लावताना दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना २०२४ मध्ये भाजप जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे. 

सन २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले होते. आता २०२४ मध्ये भाजप सरकार जाणार आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. आजही जनतेचे प्रश्न तसेच आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, हे भाजपने सांगावे? सरकारचे म्हणणे आहे की ४० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. आता त्यांची स्थिती काय आहे? किती गुंतवणूक केली आहे? आम्ही ऐकले आहे की ज्या लोकांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती त्यांचा शोध अधिकारी घेत आहेत, असा खोचक टोला अखिलेश यादव यांनी लगावला.

आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बही बनवला नाही

बुंदेलखंडच्या या लोकांना हे समजले की, भाजपने मोठी स्वप्ने दाखवली आहेत. दिल्लीतील लोक आले आणि म्हणाले की, उत्तर प्रदेशात मिसाईल तयार केले जाईल. १० वर्षे मागे वळून पाहिले तर ज्यांनी टँक, बॉम्ब बनवण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बसुद्धा तयार केला नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, सामाजिक न्यायाची लढाई केवळ जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हाच पूर्ण होईल. लोकांना हक्क मिळतील. हा लढा मोठा आहे. मागास आणि दलितांना त्यांचे हक्क द्यावे लागतील. लोकांना सामाजिक न्यायाचा फायदा होईल. आम्ही फक्त पाल, बघेल आणि धनगर समुदायाच्या हितासाठी लढा देणार नाही, परंतु या संदर्भात आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून लोकांना लोकसंख्येनुसार त्यांचे हक्क दिले जाऊ शकतात, असे अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा