शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बापरे! ATM मधून 100 ऐवजी अचानक निघाल्या 500 च्या नोटा; पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 21:45 IST

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर पडतात ही बाब कळताच एकच खळबळ उडाली.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आग्रा येथील शास्त्रीपुरम प्राक्षी एन्क्लेव्ह शाखेत असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर पडू लागल्या. एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनी पैसे काढल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. एटीएममधील बिघाडाचा लोकांनी फायदा घेतला. यामुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. 

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर पडतात ही बाब कळताच एकच खळबळ उडाली. घटनास्थळी कॅश कलेक्शन टीम पोहोचली. टीम घटनास्थळी पोहोचली तोपर्यंत एटीएममधून सुमारे 1,72,000 रुपये काढण्यात आले होते. एटीएमची अवस्थाही बिकट झाली होती.  पैशांसाठी एटीएमचीही तोडफोड करण्यात आली आहे.

सीएमएस कंपनीचे ब्रांच मॅनेजर अंशुल मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये 1,72,000 रुपये होते, त्यांना एमएसपीकडून माहिती मिळाली होती की एटीएममधून 100 रुपयांऐवजी 500 रुपयांच्या नोटा येत आहेत. ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा लोकांनी आधीच पैसे काढून घेतले होते. एटीएम उघडे पडले होते. आतापर्यंत एकूण किती रक्कम काढण्यात आली याचा डेटा काढला जात आहे. 

एटीएममधून पैसे कोणी काढले आहेत, जास्तीचे पैसे कोणी नेले याचीही माहिती बँकेला देण्यात आली आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. मात्र एटीएममध्ये काही छेडछाड झाल्याचा अंदाज बँक कर्मचाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. प्रथमदर्शनी हा तांत्रिक बिघाड असल्याचे मानले जात आहे. 

100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर आल्या आहेत. एटीएममध्ये बिघाड कसा झाला, याचा तपास सुरू असला तरी सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करून ज्यांनी जास्तीचे पैसे काढले त्यांच्या खात्यातून माहिती काढली जात आहे. सीएमएसचे शाखा व्यवस्थापक अंशुल मलिक यांनीही पोलीस चौकी प्राक्षी टॉवर शास्त्रीपुरम येथे तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :atmएटीएमUttar Pradeshउत्तर प्रदेशMONEYपैसा