शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

सुट्ट्या घालवायला रेल्वेने जाताना वेळीच करा तिकिट कन्फर्म, 'या' गाड्यांची वेटिंग लिस्ट संपेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 7:29 PM

उन्हाळ्यात जम्मूसह इतर धार्मिक स्थळांव्यतिरिक्त डोंगराळ भागाकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये तिकिटांसाठी भांडण होत आहेत. अनेक प्रवासी तिकीट मिळत नसल्यामुळे स्थानकातून परतत आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही पिकनिकला जाण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी ट्रेनची स्थिती तपासा. लग्नसमारंभ आणि शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वीच बहुतांश दिशेने धावणाऱ्या गाड्या भरलेल्या असतात. केवळ स्लीपरच नाही, तर एसी कोचमध्ये वेटिंग तिकीटही मिळत आहेत. उन्हाळ्यात जम्मूसह इतर धार्मिक स्थळांव्यतिरिक्त डोंगराळ भागाकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये तिकिटांसाठी भांडण होत आहेत. अनेक प्रवासी तिकीट मिळत नसल्यामुळे स्थानकातून परतत आहेत.

कोरोनाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या आता भरल्या आहेत. प्रवासीही वेटिंग तिकीट घेत असल्यामुळे त्यांना तिकीट कन्फर्म मिळणे कठीण होत आहे. तुम्हीही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी तुमच्या ट्रेनची स्थिती तपासा, जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.

दिल्लीच्या स्थानकांवरून दररोज धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांना आजकाल प्रचंड गर्दी होत आहे. विशेषत: वैष्णव देवी, मुंबई, लखनौ, गोरखपूर, मुझफ्फरपूर, लखनौ, पाटणा यासह दक्षिण दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना सर्वाधिक गर्दी असते. या गाड्यांमध्ये 15 दिवस ते महिनाभर प्रतीक्षा तिकिटे दिली जात आहेत.

प्रदीर्घ वेटिंगमुळे वाढली समस्यासध्याच्या परिस्थितीत आरक्षित तिकिटे मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. जर तुम्ही गोव्याला भेट देण्याची योजना आखत असाल, तर या मार्गावर निजामुद्दीन दुरांतो, गोवा संपर्क क्रांती, स्वराज, गोल्डन टेंपल, पश्चिम एक्सप्रेस, पंजाब मेल या मुख्य गाड्या आहेत आणि सर्व गाड्या भरलेल्या आहेत. वैष्णव धामला जाणाऱ्या गाड्यांमध्येही जागा नाही. जम्मू तावी एक्स्प्रेस, मालवा, झेलम, हमसफर, उत्तर संपर्क क्रांतीसह या दिशेने धावणाऱ्या गाड्यांमध्येही आरक्षित तिकिटे उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे लखनौला जाणारी कैफियत सुहेलदेवमध्ये रिग्रेस केली जाते, म्हणजेच वेटिंगही मिळत नाही.

जास्त क्षमतेच्या स्लीपर आणि जनरल डब्यातील प्रवासीरेल्वेची तयारीही प्रवाशांच्या गर्दीसमोर ठेंगणी ठरत आहे. स्लीपर, सीटिंग कोच, जनरल कोचमध्ये जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. अनेक प्रवाशांना वेटिंग तिकीट न मिळाल्यामुळे अनारक्षित तिकीट काढून दंड भरून आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागत आहे.

प्रवाशांना गरज आहे विशेष गाड्यांचीउन्हाळ्यात सर्वच मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे विशेष गाड्या चालवून दिलासा देण्याची गरज आहे. यंदाचा उन्हाळी कृती आराखडा उत्तर रेल्वेने अद्याप तयार केलेला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जास्त गर्दी लक्षात घेऊन वेळोवेळी विशेष गाड्यांची घोषणा केली जाते.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIRCTCआयआरसीटीसी