शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्या हटके ठिकाणाच्या शोधात आहात?; मग 'हे' ठिकाण फक्त तुमच्यासाठीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 16:57 IST

उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात.

(Image Credit : Mediu)

उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. खरं तर या ठिकाणाला भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणतः 18,000 फूट उंचावर वसलेलं असून या गावाचं नाव 'माणा' असं आहे. 

भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. याच ठिकाणी सरस्वती आणि अलकनंदा नद्यांचा संगम होतो. याव्यतिरिक्त येथे अनेक प्राचीन मंदिरं आणि गुहाही आहेत. बद्रिनाथपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावातील सर्व रस्ते आधी कच्चे होते. त्यामुळे अनेक लोक येथे जाणं टाळत होते. परंतु, आता या गावात विकास करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी जात असतात. 

जे पर्यटक बद्रिनाथ यात्रेला जातात. ते भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणा या गावाला भेट नक्की देतात. या गावात फार थंडी असून जवळपास 6 महिने येथे बर्फवृष्टी होत असते. संपूर्ण गाव बर्फाखाली जातं. त्यामुळे येथे राहणारी लोक थंडी सुरू होण्याआधी जवळच असलेल्या चामोली जिल्ह्यामध्ये जातात. तसेच या गावामध्ये एकच इंटर कॉलेज आहे. जे सहा महिने माणामध्ये आणि सहा महिने चामोलीमध्ये सुरू असतं. 

(Image Credit : Trawell.in)

माणामध्ये एक चहाचं दुकान असून त्या दुकानाच्या पाटिवर लिहिलं आहे की, 'भारतातील शेवटचं चहाचं दुकान'. येथे फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती या दुकानाजवळ फोटो काढतात. या गावातून पुढे कोणतही ठिकाण नसून रस्ताही नाही. थोड्या अंतरावर भारतीय सैन्याचा कॅम्प आहे. 

(Image Credit : wanderingtalestraveldreams.com)

 

माणामध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती भीमपुलला फिरण्यासाठी नक्की जातात. असं म्हटलं जातं की, पांडव याच मार्गाने स्वर्गात गेले होते. असं सांगितलं जातं की, येथे दोन मोठे डोंगर असून मधोमध एक खाडी होती. त्यामुळे हे पार करणं फार अवघड होतं. भीमने येथे दोन मोठ्या शिळा टाकल्या आणि पूल तयार केला. आजही लोक स्वर्गात जाण्याचा रस्ता समजून येथे जात असतात. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत