शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

एखाद्या हटके ठिकाणाच्या शोधात आहात?; मग 'हे' ठिकाण फक्त तुमच्यासाठीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 16:57 IST

उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात.

(Image Credit : Mediu)

उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. खरं तर या ठिकाणाला भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणतः 18,000 फूट उंचावर वसलेलं असून या गावाचं नाव 'माणा' असं आहे. 

भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. याच ठिकाणी सरस्वती आणि अलकनंदा नद्यांचा संगम होतो. याव्यतिरिक्त येथे अनेक प्राचीन मंदिरं आणि गुहाही आहेत. बद्रिनाथपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावातील सर्व रस्ते आधी कच्चे होते. त्यामुळे अनेक लोक येथे जाणं टाळत होते. परंतु, आता या गावात विकास करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी जात असतात. 

जे पर्यटक बद्रिनाथ यात्रेला जातात. ते भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणा या गावाला भेट नक्की देतात. या गावात फार थंडी असून जवळपास 6 महिने येथे बर्फवृष्टी होत असते. संपूर्ण गाव बर्फाखाली जातं. त्यामुळे येथे राहणारी लोक थंडी सुरू होण्याआधी जवळच असलेल्या चामोली जिल्ह्यामध्ये जातात. तसेच या गावामध्ये एकच इंटर कॉलेज आहे. जे सहा महिने माणामध्ये आणि सहा महिने चामोलीमध्ये सुरू असतं. 

(Image Credit : Trawell.in)

माणामध्ये एक चहाचं दुकान असून त्या दुकानाच्या पाटिवर लिहिलं आहे की, 'भारतातील शेवटचं चहाचं दुकान'. येथे फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती या दुकानाजवळ फोटो काढतात. या गावातून पुढे कोणतही ठिकाण नसून रस्ताही नाही. थोड्या अंतरावर भारतीय सैन्याचा कॅम्प आहे. 

(Image Credit : wanderingtalestraveldreams.com)

 

माणामध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती भीमपुलला फिरण्यासाठी नक्की जातात. असं म्हटलं जातं की, पांडव याच मार्गाने स्वर्गात गेले होते. असं सांगितलं जातं की, येथे दोन मोठे डोंगर असून मधोमध एक खाडी होती. त्यामुळे हे पार करणं फार अवघड होतं. भीमने येथे दोन मोठ्या शिळा टाकल्या आणि पूल तयार केला. आजही लोक स्वर्गात जाण्याचा रस्ता समजून येथे जात असतात. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत