शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

एखाद्या हटके ठिकाणाच्या शोधात आहात?; मग 'हे' ठिकाण फक्त तुमच्यासाठीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 16:57 IST

उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात.

(Image Credit : Mediu)

उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. खरं तर या ठिकाणाला भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणतः 18,000 फूट उंचावर वसलेलं असून या गावाचं नाव 'माणा' असं आहे. 

भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. याच ठिकाणी सरस्वती आणि अलकनंदा नद्यांचा संगम होतो. याव्यतिरिक्त येथे अनेक प्राचीन मंदिरं आणि गुहाही आहेत. बद्रिनाथपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावातील सर्व रस्ते आधी कच्चे होते. त्यामुळे अनेक लोक येथे जाणं टाळत होते. परंतु, आता या गावात विकास करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी जात असतात. 

जे पर्यटक बद्रिनाथ यात्रेला जातात. ते भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणा या गावाला भेट नक्की देतात. या गावात फार थंडी असून जवळपास 6 महिने येथे बर्फवृष्टी होत असते. संपूर्ण गाव बर्फाखाली जातं. त्यामुळे येथे राहणारी लोक थंडी सुरू होण्याआधी जवळच असलेल्या चामोली जिल्ह्यामध्ये जातात. तसेच या गावामध्ये एकच इंटर कॉलेज आहे. जे सहा महिने माणामध्ये आणि सहा महिने चामोलीमध्ये सुरू असतं. 

(Image Credit : Trawell.in)

माणामध्ये एक चहाचं दुकान असून त्या दुकानाच्या पाटिवर लिहिलं आहे की, 'भारतातील शेवटचं चहाचं दुकान'. येथे फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती या दुकानाजवळ फोटो काढतात. या गावातून पुढे कोणतही ठिकाण नसून रस्ताही नाही. थोड्या अंतरावर भारतीय सैन्याचा कॅम्प आहे. 

(Image Credit : wanderingtalestraveldreams.com)

 

माणामध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती भीमपुलला फिरण्यासाठी नक्की जातात. असं म्हटलं जातं की, पांडव याच मार्गाने स्वर्गात गेले होते. असं सांगितलं जातं की, येथे दोन मोठे डोंगर असून मधोमध एक खाडी होती. त्यामुळे हे पार करणं फार अवघड होतं. भीमने येथे दोन मोठ्या शिळा टाकल्या आणि पूल तयार केला. आजही लोक स्वर्गात जाण्याचा रस्ता समजून येथे जात असतात. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत