शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची पावले वळली पावसाळी पर्यटनाकडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 06:55 IST

डोंगररांंगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेली पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणू काही पर्वणीच असते.

तुकाराम रोकडे खोडाळा : जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर पालघर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणांचे पांढरेशुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहणाऱ्या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटक ग्रामीण भागात पोहोचतात. डोंगररांंगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेली पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणू काही पर्वणीच असते.

मुसळधार पाऊस सुरू झाला की पर्यटक निसर्गप्रेमींना वेध लागतात ते ग्रामीण भागातील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्या पाण्यात चिंब भिजण्याचे व मनसोक्त पावसाचा आनंद घेण्याचे. मग त्यांची पावले आपोआप धबधबे, धरणे व उंचावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचे वातावरण हे सारे अनुभवण्यासाठी वळतात. पावसाळ्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटतात. ढगांचा गडगडाट, थंडगार वातावरण, मातीचा सुगंध आणि बहरलेला निसर्ग हे सर्व काही जुळून येते ते पावसाळ्यातच.

जूनमधील दोन-चार दिवसांचा पाऊस सोडला तर जुलैमध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षाच केली जात असतानाच पुनर्वसू नक्षत्रात पाऊस दोन-तीन दिवस धो-धो कोसळला अन् पावसाळी पर्यटक स्वच्छंद फिरण्यासाठी गावरानावर वळू लागला. 

पालघर-नाशिकचे धबधबे आकर्षणपालघर तसेच नजीकच्या नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा धरण, भावली धरण, भावली धबधबा, देवगाव परिसर, भंडारदरा धरण, खोडाळा, कळसूबाई, श्रीघाट, सूर्यमाळ, आमले घाट, अशोका धबधबा, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, जव्हार, इगतपुरी या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. त्याचप्रमाणे कसारा घाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे या ठिकाणीही पावसाळ्यात गर्दी होत असते. कसारा घाटातील धुके अनुभवण्यासाठी सकाळपासूनच अनेक तरुण धुके अनुभवण्यासाठी रस्त्यावर उभे राहतात.

टॅग्स :tourismपर्यटनRainपाऊसpalgharपालघर