शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

'या' कारणांमुळे भारतातील लोक फार कमी घेतात सुट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 17:43 IST

वेगाने करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ते वेळेची परवा करत नाहीत. आणि अनेक तास ऑफिसमध्ये घालवतात. इतकेच नाही तर काही काळानंतर त्यांना याची सवय सुद्धा लागते.

(Image credit : www.financialexpress.com)

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीच्या सर्वे रिपोर्टनुसार, भारतीय तरुण दुसऱ्या देशांच्या तुलनेत फार कमी सुट्टी घेतात. रिपोर्टनुसार, वेगाने करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ते वेळेची परवा करत नाहीत. आणि अनेक तास ऑफिसमध्ये घालवतात. इतकेच नाही तर काही काळानंतर त्यांना याची सवय सुद्धा लागते. यामुळे ते कंपनीकडून मिळणाऱ्या वार्षिक सुट्या संपवू शकत नाहीत. पण भारताचा याबाबतील चौथा क्रमांक आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश आहेत.  

द हॉलिडे गिल्ट सिंड्रोम

सरकारी कंपनीचे कर्मचारी असोत वा प्रायव्हेट कंपनीचे. सर्वच लोक जास्त प्रमाणात द हॉलिडे सिंड्रोमने ग्रस्त असतात. असे लोक प्लन करुनही सुटी घेतात किंवा घेत नाहीत. असे जेव्हा सुटी घेण्याबाबत विचार करतात तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामांच्या असायनमेंट असतात. ही कामं कंपनीच्या फायद्यासाठी आणि करिअरच्या दृष्टीनेही पूर्ण करणे गरजेचे असते. अशात ते हे काम पूर्ण करण्यासाठी थांबतात आणि सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. असे लोक सुटी घेतली तरी लवकर ऑफिसला परत येतात. 

प्रोजेक्ट पूर्ण करण्याची चिंता

प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्यांना मिळालेली असायनमेंट वेळेवर पूर्ण झाली तर ते न थांबता काम सतत काम करु शकतात. पण होतं असं की, एक असायमेंट पूर्ण झाल्यावर अशा लोकांना लगेच दुसरी असायमेंट दिली जाते. यामुळे त्यांचा सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. अनेकदा ऑफिसेसमध्ये हेही बघण्यात आले आहे की, ऑफिसमध्ये मेहनती लोकांना कामावर काम दिलं जातं, ज्यामुळे ते सुट्टीचं प्लॅनिंग करु शकत नाही. तेच कामचोर लोक भरपूर सुट्या घेतात आणि त्यांना कामाची चिंताही नसते. 

डे आफ्टर टूमारो डिसऑर्डर

भारतात डे आफ्टर टूमॉरो डिसऑर्डरने ग्रस्त लोकांची संख्याही भरपूर आहे. ही स्थिती तेव्हा अधिक वाढते जेव्हा अनेक प्रयत्नांनंतरही काम पूर्ण होत नाही. अशात व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकतं. वेळेसोबतच काम पूर्ण करण्याची डेडलाइन जवळ येते. डेडलाइनच्या चिंतेत व्यक्ती काम पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. 

बॉसची कामाची कटकट

बॉसचं कामासाठी सतत टोकत राहणं कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यापासून रोखतं. जर बॉस सतत म्हणत असेल की, काम खूप जास्त आहे, कसं केलं जाईल इत्यादी. तर याने कर्मचारीही सुट्टी घेण्याचा विचार करत नाहीत. 

पुढे जाण्याची शर्यत

आज वेगाने स्पर्धा वाढत आहे. अशात जास्त दिवस सुटी घेणे जमत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने जास्त दिवस सुटी घेतली तर त्याचा सहकारी त्याच्या कामावर होल्ड मिळवतो. त्यामुळे त्याच्याकडून ते काम परत घेण्याची शक्यताही कमी असते. यामुळे अनेक कर्मचारी सुटी घेण्याचा विचार करत नाहीत. 

या गोष्टींची घ्या काळजी

१) ऑफिसमध्ये तुम्ही काम करण्यासाठी जाता गप्पा करण्यासाठी नाही. त्यामुळे वेळेनुसार रोजचं काम रोज पूर्ण करत चला.

२) काम करतेवेळी अशा सहकाऱ्यांपासून दूर रहा जे आपलं काम करत नाहीत आणि कोणत्याही गोष्टीवर वाद घालायला तयार असतात. 

३) ज्या मुद्यावर तुम्हाला वाद घालायचा नाहीये, तो मुद्दा काढू नका. 

४) सर्वांसोबत राहूनही आपले विचार सकारात्मक ठेवा आणि चांगलं काम करा. याचा विचार करा की, तुम्हाला तुमचं भविष्य ठरवायचं आहे. दुसरे काय विचार करुन काम करत आहेत याची काळजी करु नका.

टॅग्स :Employeeकर्मचारीPersonalityव्यक्तिमत्वtourismपर्यटन