शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कपल्ससाठी हे शहर ठरु शकतं परफेक्ट डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 12:44 IST

कपल्स जर फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशनचा शोध घेत असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. हे परफेक्ट डेस्टिनेशन गुवाहाटीपासून जवळपास 180 किलोमीटर दूर आहे.

कपल्स जर फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशनचा शोध घेत असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. हे परफेक्ट डेस्टिनेशन गुवाहाटीपासून जवळपास 180 किलोमीटर दूर आहे. आसाममधील तेजपूर शहर हे आसाममधील 'प्रेमाचं शहर' म्हणून आणि राहण्यासाठी सर्वात उपयुक्त शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया या शहराची खासियत काय आहे.

सिटी ऑफ रोमान्स 

गुवाहाटीपासून जवळपास 180 किमी दूर तेजपूर हे शहर आहे. विशाल ब्रम्हपुत्रा नदीच्या किना-यावर वसलेल्या या शहराला आसामची सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं. तेजपूर शहर हे कपल्ससाठी परफेक्ट डेस्टिनेशन मानलं जातं. इथे फिरण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. तसेच तेजपूर या शहरापासून पुढे अरुणाचल प्रदेशची सुरुवात होते. तेजपूर या शहराला सिटी ऑफ रोमान्स असंही म्हटलं. 

पदुम पुखरी तलाव

पदुम पुखरी नावाचा प्रसिद्ध आणि सुंदर तलाव इथे आहे. पदुमचा अर्थ कमळ आणि पुखरीचा अर्थ तलाव असा होतो. तसेच या शहरातील आणखी एक बोर पुखरी म्हणजेच तलाव प्रसिद्ध आहे. इथे आल्यावर तुम्ही टॉय ट्रेन आणि पॅडलिंगचाही आनंद घेऊ शकता. या तलावात एक म्युझिकल फाऊंटेनही आहे. 

लीची फळासाठी प्रसिद्ध

असं सांगतात की, इथे आल्यावर लीची हे फळ आवर्जून खायला हवं. आपल्या वेगळ्या आकारासाठी, गर्द रंगासाठी आणि गोडव्यासाठी लीची प्रसिद्ध आहे. भारतासह लीचीला परदेशातही मोठी मागणी आहे. 

अरुणाचल प्रदेशासाठी ट्रान्झिट पॉईंट

तवांग, सेला पास, बोमडीला आणि झिरो व्हॅली यांसारख्या अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध शहरांमध्ये जाण्यासाठी तेजपूरहूनच जावं लागतं. त्यामुळे या ठिकाणांवर जाणारे पर्यटक हे तेजपूरला थांबणं पसंत करतात. 

नामेरी नॅशनल पार्क

(Image Credit : travelsindiamart.com)

तेजपूरपासून जवळपास 35 किमी अंतरावर नामेरी नॅशनल पार्क आहे. 200 वर्ग किमीमध्ये पसरलेल्या या नॅशनल पार्कमध्ये रॉयल बंगाल टायगरही बघायला मिळतात. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहणे पसंत असेल तर इथे अनेक रिसॉर्टही आहेत. इतकेच काय तर येथील तलावात तुम्ही मासे पकडण्याचाही अनुभव घेऊ शकता. या नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती आणि विविध प्रजातींचे पक्षी-प्राणीही तुम्हाला बघायला मिळतात. 

टॅग्स :Travelप्रवासAssamआसाम