शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोरोनाला चकवण्यासाठी पर्यटक मालदीवकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 05:09 IST

मालदीवनं पर्यटनावरची बंधनं सैल केल्याबरोबर भारतीय पर्यटकांनी तिथे रांगा लावल्या आहेत. दुसऱ्या देशांतील पर्यटकांची संख्या मात्र जवळपास शून्यावर आली आहे.

मालदीव हा आशिया खंडातला सर्वांत कमी लोकसंख्येचा आणि सर्वांत कमी क्षेत्रफळाचा देश; पण जगातील सर्वाधिक सुंदर आणि निसर्गसंपन्न देशांत त्याची गणना होते. एकूण १२०० बेटांचा हा द्वीपसमूह हिंदी महासागराच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ वसलेला आहे. या देशात एकूण १२०० द्वीपसमूह असले तरी त्यातील केवळ २०० बेटांवरच लोकवस्ती आहे. या देशाला उत्पन्नाचे फारसे स्त्रोत नाहीत; पण त्यांची निसर्गसंपत्ती हाच त्यांचा खूप मोठा ठेवा आहे. त्यामुळे जगभरातून दरवर्षी हजारो पर्यटक मालदीवला भेट देत असतात. पर्यटनावरच मालदीवची अर्थव्यवस्था प्रामुख्याने चालते. 

पण कोरोनाकाळात संपूर्ण जगभरातच पर्यटन बंद झाल्यानं ज्या देशांना सर्वाधिक फटका बसला त्यात मालदीवचा समावेश आहे; पण मालदीव आता त्यातून बाहेर पडू पाहतो आहे. जगात अनेक ठिकाणी अजूनही पर्यटनावर बंदी असताना आणि त्या त्या देशांत गेल्यानंतर किमान १४ दिवस विलगीकरणाची सक्ती असताना मालदीवने पर्यटनासंबंधीचे आपले अनेक नियम शिथिल केले आहेत. कोणत्याही देशांतून मालदीवकडे निघताना चार दिवस आधी केलेली कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल, तरी मालदीवला आल्यावर पुन्हा त्यांना कोणत्याही टेस्टची गरज नाही, शिवाय १४ दिवस विलगीकरणातही राहावे लागत नाही. या संधीचा फायदा घेत भारतीय पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात मालदीवकडे ओघ सुरू आहे. याची कारणं दोन. एकतर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनामुळे लोकांच्या बाहेर फिरण्यावर मोठ्या प्रमाणात बंधनं आली होती. वर्षभरापेक्षा जास्त काळ घराबाहेर  न पडता आलेल्या लोकांना पर्यटनाची आस लागलेली आहे. किमान काही दिवस तरी निसर्गाच्या सान्निध्यात, कोरोनाच्या भीतीपासून दूर राहावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा यासाठी पर्यटक आसुसलेले आहेत. त्याचवेळी अनेक देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. दुसरं कारण म्हणजे दुसऱ्या टप्प्यात भारतात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. रुग्णांची संख्या गणिती वेगाने वाढते आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी जाऊन काही दिवस राहावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे.

मालदीवनं पर्यटनावरची बंधनं सैल केल्याबरोबर भारतीय पर्यटकांनी तिथे रांगा लावल्या आहेत. मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या एकीकडे वाढत असताना, दुसऱ्या देशांतील पर्यटकांची संख्या मात्र जवळपास शून्यावर आली आहे. चीन, जपान आणि दक्षिण कोरियाचे पर्यटकही दरवर्षी मोठ्या उत्साहानं मालदीवला हजेरी लावतात, पण मालदीवमधले तिथले पर्यटक तब्बल ९८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मालदीवमधील भारतीय पर्यटकांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत आत्ताच ५० टक्क्यांनी वाढली आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीतच मालदीवला तब्बल ४४ हजार पर्यटकांनी भेट दिली. गेल्या संपूर्ण वर्षाच्या म्हणजे २०२० च्या तुलनेत ती दुप्पट होती.  

पर्यटनाशी संबंधित भारतीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे, अलीकडे भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. लसीकरण सुरू झालं असलं तरी इतक्या मोठ्या लोकसंख्येला लस देण्यासाठी बराच काळ लोटेल, शिवाय अनेक ठिकाणी लॉकडाऊन आता पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे सुरक्षित आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून भारतीय पर्यटक मालदीवला पसंती देत आहेत. 

कोलकाताच्या  अगवानी ट्रॅव्हल्सचे संचालक प्रदीप शर्मा सांगतात, मालदीव अगोदर हाय एंड डेस्टिनेशन मानले जात होते, पण आता तिथले हॉटेलवालेही लोकांना अत्यंत आकर्षक डील देत आहेत. दक्षिण आशिया पर्यटनासाठी जवळपास संपूर्णपणे बंद आहे. थायलंडही अजून सुरू झालेलं नाही. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांनीही मालदीवला पहिली पसंती दिली आहे. स्थानिक विमानसेवाही पर्यटकांना स्वस्त आणि आकर्षक ऑफर्स देत आहेत. ‘विस्तारा’ एअरलाइन्सने मुंबई आणि मालदीवची राजधानी मालेपर्यंत नॉनस्टॉप हवाईसेवा सुरू केली आहे. मालदीव सरकारनंही पर्यटकांवरची बरीच बंधनं उठवली आहेत, त्याचवेळी ब्रिटन आणि इतर अनेक देशांनी बाहेरच्या देशांतून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण अत्यावश्यक केलं आहे. दुबईलाही अनेक भारतीय पर्यटक जातात; पण सध्या तिथे कडक उन्हाळा सुरू आहे आणि तिथे पोहोचल्यावर कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांचा मालदीवकडे ओढा वाढतो आहे. 

देशच दुसरीकडे हलवणार!जलवायू परिवर्तनाच्या धोक्यामुळे जे देश संकटात सापडले आहेत, त्यात मालदीवचा नंबर खूप वरचा आहे. समुद्राच्या पातळीपासून हा देश खूपच जवळ आहे. समुद्राच्या पातळीत जर काही मीटरने वाढ झाली, तर हा निसर्गसंपन्न देश संपूर्णपणे पाण्यात गडप होण्याची भीती आहे. त्यासाठीही मालदीव सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जगात दुसरीकडे जागा खरेदी करून तिथे देशातल्या सगळ्या लोकांचं स्थलांतर करायचं अशीही एक योजना आहे. त्यासाठीही मालदीव सरकारला लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसा उभा करायचा आहे.

टॅग्स :Maldivesमालदीवcorona virusकोरोना वायरस बातम्या