शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

३५० वर्षे अभेद्य राहिलेल्या मुरुड-जंजिरा किल्ल्यामधील हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 14:58 IST

मुरूड जंजिरा हा ऐतिहासिक किल्ला १७ व्या शतकात तयार करण्यात आला होता.

(image credit- outlook india)

मुरूड जंजिरा हा ऐतिहासिक किल्ला १७ व्या शतकात तयार करण्यात आला होता. आकर्षक रचनेसह तयार करण्यात आलेला हा किल्ला ३५० वर्षापांसून  समुद्राच्या लाटासह उभा आहे. मुंबईपासून सुमारे १६५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या ऐतिहासिक मह्त्वप्राप्त असलेल्या किल्ल्याचे नाव कोकणी आणि अरेबिक अशा दोन शब्दांना मिळून तयार झाले आहे. 

समुद्रापासून ९० फिट उंचावर  तयार झालेल्या या किल्ल्याची खासियत अशी होती की  समुद्राच्या मधोमध हा किल्ला तयार झाला होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला हा किल्ला असा एकमेव आहे. ज्याला कोणीही जिंकू शकले नव्हते. ब्रिटीशांपासून, पोर्तुगीजांपर्यंत, मुगल, छत्रपती शिवाजी महाराज, तसंच कान्होजी आंग्रे, आणि संभाजी महाराज यांनी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणीही हा किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात सफल झाले नाही. त्यामुळे एक वेगळी ओळख या किल्ल्याची आहे.

३५० वर्ष जुन्या असलेल्या या किल्ल्याला 'अजेय किल्ला'  सुद्धा म्हटलं जातं होत. या किल्ल्याची खासीयत अशी होती की  त्या किल्ल्याचे दरवाजे भिंतीच्या आत बनवले होते. म्हणून सहज दिसून येणारे नव्हते.  या गोष्टीमुळे या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी आलेले शत्रु किल्ल्यांपर्यंत येऊन हल्ला करू शकत नव्हते. 

हा किल्ला अहमदनगरचे मलिक अंबर यांच्या देखरेखीखाली तयार झाला. हा किल्ला तयार होण्यासाठी २२ वर्षांचा कालावधी लागला. हा किल्ला २२ एकरात पसरला आहे. २२ सुरक्षा चौकी या किल्ल्यात आहेत. तसंच ४० फिट उंच भिंतीनी घेरलेला आहे. या ठिकाणी सिद्दीकी शासनकर्त्यांच्या अनेक तोफा ठेवल्या आहेत. ( हे पण वाचा-वाघ आणि हत्तीची कुत्र्यासोबत मैैत्री? विविध प्रकारच्या प्राण्यांचे प्रेम आणि मैत्री पाहून व्हाल अवाक्!)

या किल्ल्यात पाण्याचा तलाव सुद्दा आहे. सगळ्यात खास गोष्ट ही आहे की हा किल्ला समुद्राच्या खारट पाण्यामध्ये उभा असून सुद्धा या किल्ल्यात असलेल्या तलावातील पाणी गोड आहे. हे पाणी गोड का आहे. याचं रहस्य अजून उलगडलेलं नाही. सध्याच्या काळात मोठया प्रमाणावर पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी जातात.( हे पण वाचा-पार्टनरसोबत बीचवर एन्जॉय करायला गोवा नाही तर जवळचं असलेल्या 'या' ठिकाणाला द्या भेट)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स