शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

बाइक रायडिंगचं पॅशन स्वस्थ बसू देत नाही मग ही नऊ ठिकाणं आहेत की त्यातून एक निवडा!

By admin | Published: May 12, 2017 6:50 PM

प्रवासात भन्नाट अनुभव देणारे अनेक रस्ते भारतात आहेत जे बाइकवरून करायच्या प्रवासासाठीच प्रसिद्ध आहेत.

 

-अमृता कदम

बाइक म्हणजे प्रवासाचं एक साधन असं तुम्हा-आम्हाला वाटत असलं तरी अनेक जणांसाठी बाइक चालवणं ही पॅशन असते, त्यांचा छंद असतो. त्यामुळेच असे थ्रीलवेडे बाइकर्स गाडीला किक मारु न अगदी लांबच्या प्रवासाला जायला सज्ज असतात. प्रवासात भन्नाट अनुभव देणारे अनेक रस्ते भारतात आहेत जे बाइकवरून करायच्या प्रवासासाठीच प्रसिद्ध आहेत.

1. खार्दुंग ला ते लेह-लडाख

खार्दुंग ला हा सगळ्यात उंचावरचा मोटरेबल रोड आहे. एका बाजूला हिमालयाच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, त्यातून वळणं घेत जाणारा रस्ता...अ‍ॅडव्हेंचरसाठी तुम्हाला अजून काय हवंय? मनालीमधून बुलेटसारखी दमदार बाइक भाड्यानं घेऊन तुम्ही हा प्रवास करु शकता. या प्रवासात पहाडी, बौद्ध संस्कृतीच्या खुणाही जागोजागी दिसतात. एप्रिल पासून आॅगस्टपर्यंत तुम्ही केव्हाही या प्रवासाला जाऊ शकता. पण त्यानंतर बर्फवृष्टी सुरु व्हायला लागली की हा रस्ता बऱ्याचदा बंद असतो.

2. स्पिती व्हॅली

जर तुम्ही लेह-लडाख, हिमाचल प्रदेशला फिरायला निघालाच असाल, तर बाइकवरु न स्पिती व्हॅलीला जायला अजिबात विसरु नका. सतलज नदीला सोबत घेऊन प्रवास करताना काजा, टैबो, स्पिती आणि पीन व्हॅलीसारखी ठिकाणं तुम्हाला थांबायला भागच पाडतात. इथल्या बस्पा आणि किन्नौर भागात रस्त्याच्या कडेनं सफरचंद आणि जर्दाळूच्या बागा दिसतात. वाटेत एखाद्या मंदिरात थांबल्यावर येणारा शांततेचा अनुभव एरवीच्या धकाधकीत विरळाच. इथे जाण्यासाठीही लेह-लडाख प्रमाणेच एप्रिल ते आॅक्टोबरपर्यंतचा काळ योग्य आहे.

 

          

3. वालपराई आणि वाझाचल फॉरेस्ट

बाइक रायडिंगसाठी हा ड्रीम रूट मानला जातो. केरळ आणि तामिळनाडूमधून जाणारा हा रस्ता तामिळनाडूतल्या पोलाची आणि केरळमधल्या चालाकुडीला जोडतो. सदाहरित जंगलामधून जाणाऱ्या या रस्त्यावरु न बाइक चालवण्याचा आनंदच अवर्णनीय! शिवाय हा प्रदेश भरपूर पावसाचा असल्यानं वाटेत अनेक छोटे-मोठे धबधबे तुम्हाला पहायला मिळतात. अथिरपाल आणि वाझाचलचे धबधबे हे या मार्गावरील खास आकर्षण. हा प्रवास करण्याचा काही खास सीझन नाही. तुम्ही वर्षातून केव्हाही या मार्गावरु न प्रवास करु शकता.

4. मुंबई ते गोवा

दिल चाहता है गाण्यातला मुंबई ते गोवा प्रवास सगळ्यांनाच आठवत असेल. अनेकांनी तसाच गाडीनं केलेल्या प्रवासातला रोमँटिसिझम अनुभवला असेलच; पण मुंबईवरु न गोव्याला बाइकवरु न निघण्यातही एक रोमांच आहे. बाइकिंगचे शौकिन आणि सराइत प्रवाशांच्या दृष्टीनं हा मार्ग बराचसा अमेरिकेतल्या 101 हायवेशी मिळता-जुळता आहे. जवळपास दहा तासांचा हा प्रवासच तुम्हाला रिफ्रेश करून टाकतो.

5. जयपूर ते जैसलमेर

प्रवास म्हटलं की रस्त्याच्या दुतर्फा शेतं, झाडं आणि त्यातून धावणारी आपली गाडी हेच चित्र डोळ्यासमोर उभं राहत. पण तुरळक, काटेरी बोरी-बाभळीची झाडं आणि उडणारी पिवळसर रेती...जयपूरपासून जैसलमेरला जाण्याचा हा अनुभव आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. 600 किलोमीटरच्या या साहसी प्रवासात राजस्थानमधले प्रदेशांचं वेगळेपण तसंच राजस्थानची संस्कृती समजून घ्यायला मदत होते. अर्थात राजस्थानमधल्या भयंकर उष्णतेचा विचार करता हा प्रवास करायला आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी एकदम योग्य!

           

6. अहमदाबाद ते कच्छ

जयपूर ते जैसलमेरप्रमाणे हा प्रवासही वाळवंटातूनच होतो. फरक एवढाच की इथे भवताली तुम्हाला पीठ पसरल्याप्रमाणे शुभ्र रेती पहायला मिळते. रात्री हा प्रवास करण्याचा अनुभव शब्दांत न मांडता येण्याजोगाच आहे. अंधाऱ्या रात्रीत चमकणारे शुभ्र रेतीचे कण तुम्हाला चांदण्यातून सैर केल्याचा अनुभव देतात. उष्म्यामुळे या प्रवासालाही तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यानच जाऊ शकता.

7. वेस्टर्न अरु णाचल प्रदेश

हिमालयाच्या रांगांतून प्रवास करण्याचा आनंदच वेगळा असतो. त्यामुळे वेस्टर्न अरूणाचलची सफर तुमच्यासाठी नक्कीच यादगार बनेल. हा पहाडी भाग असल्यानं इथले रस्ते फारसे चांगले नाहीत. त्यामुळे या चढ-उतारांनी भरलेल्या रस्त्यावरु न बाइक चालवण्यात एक वेगळंच थ्रील असतं. मधूनच बर्फाची जणू पातळ चादरच अंथरली आहे, असे रस्त्याचे पट्टे...इथल्या आदिवासी संस्कृतीशीही तुमची ओळख होते. मार्च ते मे आणि आॅक्टोबर ते नोव्हेंबर हा प्रवासासाठीचा सगळ्यात उत्तम काळ.

8. शिलाँग ते चेरापुंजी

पाण्याची दोन वेगवेगळी रूपं या प्रवासात पहायला मिळतात. शिलाँगमध्ये बर्फाच्छादित शिखरं तर चेरापुंजीच्या दिशेनं यायला लागल्यावर पावसाच्या हलक्या सरी...त्यामुळे हा प्रवास करताना बाइक काळजीपूर्वकच चालवावी लागते. हा प्रवासही सीझनचा विचार करु नच प्लॅन करावा लागतो. कारण इथे येण्यासाठीचा योग्य काळ म्हणजे आॅक्टोबर ते मार्च.

9. दार्जिलिंग ते सिक्कीम

हिमालयातून जाणारा हासुद्धा पहाडी रस्ता. या प्रवासात तुमच्या बाइकच्या सोबत ‘मेरे सपनों की राणी’ गाण्यात दिसलेली आणि युनेस्कोच्या वलर््ड हेरिटेजमध्ये सामील केलेली ट्रेनही असेल. शिवाय जगातील दुसऱ्या क्र मांकाचे उंच शिखर असलेल्या कांचनजुंगाचंही या प्रवासात दर्शन होत राहतं. वर्षभरात केव्हाही तुम्ही ही ट्रीप प्लॅन करु शकता. या ट्रीपला जाण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बायकर्स क्लबशी संपर्क साधू शकता. किंवा तुमचा ग्रूप असेल तर स्वत:ही प्रवास प्लॅन करु शकता. बाइकच्या प्रवासात मुक्कामाचं ठिकाण महत्त्वाचं नसतं तर महत्त्वाचा असतो आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होत घेतलेला प्रवासाचा अनुभव. अशा अनुभवाला सामोरं जायचं असेल, तर या सुट्टीत तुमच्या बाइकला तुम्ही नक्की किक मारु शकता.