शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

मॉन्सूनमध्ये 'या' ५ ठिकाणांच्या पडाल प्रेमात, पैसा वसूल ट्रिपचा करा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 13:17 IST

रिमझिम पाऊस, मनमोहक वातावरण, झाडांची हिरवीगार चादर आणि त्यात मित्रांची साथ एका चांगल्या आणि कधीही न विसरता येणाऱ्या ट्रिपसाठी यापेक्षा आणखी काय हवं?

मॉन्सूनमधील वातावरण हे फिरायला जाण्यासाठी फारच चांगलं असतं. रोड ट्रिप असो वा सोलो किंवा मित्रांसोबत मस्ती-मजी करण्यासाठी खास वेळ मानला जातो. पण अनेकांना या दिवसात वेगळा अनुभव घेण्यासाठी कुठे जावं हेच माहीत नसतं. किंवा नेहमीच्या ठिकाणांवर जाऊन जाऊनही कंटाळा आलेला असतो.

रिमझिम पाऊस, मनमोहक वातावरण, झाडांची हिरवीगार चादर आणि त्यात मित्रांची साथ एका चांगल्या आणि कधीही न विसरता येणाऱ्या ट्रिपसाठी यापेक्षा आणखी काय हवं? काही ठिकाणांची सुंदरता हिवाळ्यात वाढते तर काही ठिकाणांची उन्हाळ्यात. तसंच काही ठिकाणांचं सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलतं. अशाच ५ ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अलेप्पी

(Image Credit : Wheelstreet)

अलेप्पीला अलप्पुजहा असंही म्हटलं जातं. अलेप्पी हे ठिकाण एखाद्या चित्रकाराने रेखाटलेल्या सुंदर चित्रासारखं आहे. इथे नदी आहेत, दऱ्या आहेत, बॅकवॉटर्स आहे आणि ८२ किलोमीटर लांब समुद्र किनाराही आहे. हे ठिकाण केरळ राज्यातील तीन मोठ्या नद्या मनीमाला, पम्बा आणि अचंकोविलच्या संगमासाठीही लोकप्रिय आहे.

कुठे फिराल?

अलेप्पी बीच, मरारी बीच, इंटरनॅशनल कॉयर म्युझिअम, कुमारकोम पक्षी संग्रहालय, सेंट एंड्रयूज बेसिलिका, सेंट मेरी चर्च.

कसे पोहोचाल?

इथे पोहोचणे फार काही कठीण नाही. मरारी बीच मरारीकुलम रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. इथे तुम्ही रेल्वेने पोहोचू शकता. तसेच इथे बसेस-टॅक्सीची देखील सुविधा आहे.

कोडाइकनाल

(Image Credit : Oyo)

तामिळनाडूतील कोडाइकनाल हिल स्टेशनला हिल स्टेशनांची राजकुमारी असंही म्हटलं जातं. हे ठिकाण २१९५ मीटर उंचीवर आहे. हिरवेगार घनदाट जंगल आणि वेगवेगळे प्राणी येथील आकर्षण आहे.

कुठे फिराल?

कोडाइकनाल लेक, गुना केव, वाताकनाल फॉल्स, पांबर फॉल्स, पेरूमल पीक, मानावनुर लेक.

कसे पोहोचाल?

मदुरे एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन दोन्ही येथून जवळ आहे. तसेच तामिळनाडू राज्य परिवहन मंडळाच्या बसेसही इथे सुरू असतात.

लोणावळा

(Image Credit : Holidify)

लोणावळ्याचं खरं सौंदर्य पावसाळ्यात खुलतं. हे ठिकाण पुण्यापासूनही जवळ आणि मुंबईपासूनही जवळ आहे. पावसाळ्यात इथे सगळीकडे तुम्हाला सुंदर डोळ्यांना वेगळाच आनंद देणारी हिरवळ आणि धबधबे बघायला मिळतील. डोंगरांवरून खाली कोसळणारं पाणी बघण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. 

कुठे फिराल?

टायगर पॉईंट, लॉयन पॉईंट, कारला लेणी, भाजा लेणी, कुने फॉल्स.

महाबळेश्वर

(Image Credit : TripAdvisor)

मॉन्सूनमध्ये रोमॅंटिक ठिकाण शोधत असाल तर महाबळेश्वर परफेक्ट ठिकाण आहे. कधी मुसळधार पाऊस तर कधी रिमझिम धारा, सगळीकडे परसलेलं धुकं आणि हिरवीगार झाडं असं मनमोहक वातावरण आणि चित्र तुम्हाला इथे बघायला मिळेल. 

कुठे फिराल?

पवना डॅम, वेना लेक, मेप्रो गार्डन, प्रतापगढ किल्ला, लिंगमाला फॉल्स, पारसी पॉईंट

वायनाड

(Image Credit : The Hindu)

वायनाड हे खासकरून मॉन्सून डेस्टिनेशन म्हणूनच ओळखलं जातं. केरळमधील या सुंदर ठिकाणाचा अंदाज तुम्ही इंटरनेटवर केवळ फोटो बघून लावू शकत नाही. येथील सौंदर्य शब्दात सांगता येणार नाही असंच आहे. सुंदर धबधबे, वाइल्डलाईफ आणि दुसरीकडे हिरवीगार मैदाने येथील आकर्षण आहे. पावसाळ्यात इथे तीन दिवस मॉन्सून टूरिज्म फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. 

कुठे फिराल?

बानसुरा सागर डॅम, चेंब्रा पीक, कुरुवा आइलॅंड, मुथंगा वाइल्डलाईफ सेंचुरी, इडक्कल गुहा.

कसे पोहोचाल?

केरळच्या सर्वच मोठ्या शहरांमधून वायनाडला पोहोचण्यासाठी सुविधा आहेत. कोझीकोड एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन इथे पोहोचण्यासाठी जवळचा पर्याय आहे.

चेरापूंजी, मेघालय

(Image Credit : TravelTrian)

चेरापूंजी हे भारतातील सर्वात जास्त पाऊस होणारं किंवा वर्षभर पाऊस होणारं ठिकाण आहे. त्यामुळे हे ठिकाण इतर ठिकाणांपेक्षा सर्वात वेगळं आणि सुंदर ठरतं. येथील धबधबे फारच आकर्षक आहेत. त्यामुळे मॉन्सूनच्या वेगळ्या अनुभवासाठी तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता.

कुठे फिराल?

लीविंग रूट ब्रिज, वाकाबा फॉल्स, थांगखारंग पार्क, माव्समई गुहा.

कसे पोहोचाल?

चेरापूंजीपर्यंत रस्ते मार्गाने सहजपणे पोहोचता येतं. गुवाहाटी रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण १५० किमी अंतरावर आहे. तर एअरपोर्टपासून १७० किमी अंतरावर.

 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलTravel Tipsट्रॅव्हल टिप्स