‘नेट सराव सोडा, खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर दिली. ...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्याच्या घडीला सराव करत आहेत. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. ...
शास्त्री म्हणाले, ‘आम्हाला हार्दिक पांड्याची उणीव भासेल. तो दुखापतग्रस्त आहे. तो गोलंदाज व फलंदाज म्हणून संघाचा समतोल साधतो. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त गोलंदाज खेळविता येतो. तो लवकर फिट होईल, अशी आशा आहे. ...