जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे आपल्या जागेत ग्रामपंचायतीने केलेले रस्त्याचे अतिक्रमण बाजूला करण्यासाठी सुट्टीवर आलेले सुभेदार विनोद कदम जागेचा प्रश्न अजूनही न सुटल्याने आपली रजा वाढवणार होते. मात्र, पुलवामा येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी र ...
चिपळूण : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळुणातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे चिपळुणात कडकडीत बंद पाळण्यात ... ...
सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत सर्व पक्षीयांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापार बंद होता. रिक्षाचालकांनीही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा बंद यशस्वी ठरला. ...
काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर नेटकऱ्यांमधून हल्ल्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. ...