जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
आपल्या भारत देशाबाबत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या माजी सरपंचाने अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. ''भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'',असे वादग्रस्त विधान विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यदने केले आहे. ...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. ...
पुलवामामधील पिंगलान येथे सोमवारी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ...