जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
राहुल गांधी यांनी देशातील जनतेची, शहीदांच्या कुटुंबियांची आणि भारतीय जवानांची माफी मागितली पाहिजे असा हल्लाबोल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. ...
पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमानिमित्त दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला भारताचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे ...
लोकसभा निवडणुका एका भीषण हल्ल्याचे भांडवल करून नव्हे तर गरीबी, आरोग्याचे प्रश्न अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पाहिजेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे. ...