जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे. ...
ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात त ...