Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत. जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल. ...
पाकिस्तानशी चर्चा होईल तर केवळ दहशतवादावरच आणि पीओकेवरच, भारत सहन करणार नाही आण्विक ब्लॅकमेलिंग! कारवाई केवळ स्थगित, पुन्हा आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल; दहशतवाद्यांचा आत्मविश्वास भारताने नष्ट केला. ...