शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...
सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या तपासाला कंटाळून अखेर बिहार पोलिसांमध्ये रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे बिहारचे पोलीस मुंबईत आले होते. त्यांना पालिकेने क्वारंटाईन केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते. ...
आपले सामाजिक योगदान किती ? ऑर्केस्ट्रामध्ये एक दोन गाणी म्हटल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपण काहीही बोलू शकतो हा सल्ला आपल्याला दिला कोणी ?? जरा सांभाळून बाईसाहेब, अशा शब्दात माजी पोलीस अधिकारी विश्वास कश्यप यांनी पत्र लिहिलं आहे. ...
दिशाच्या वडिलांनी मालवणी पोलिसांना दिलेल्या अर्जात लेकीबद्दल चुकिच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा, असे म्हणत काही लोकांची नावेही दिल्याची माहिती आहे. ...
मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. ...