मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मनोहर पर्रीकर यांच्या जडणघडणीत त्यांची आई राधाबाई यांची मोठी भूमिका राहिली आहे. स्वत: अल्पशिक्षित असल्या तरी आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे ही त्यांची कळकळ होती. त्यासाठी सतत मुलांच्या मागे अभ्यासासाठी त्या रेटा लावायच्या. एकपाठी असणाऱ्या मला पुस्तक घेऊ ...
देशातील पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. गोव्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, विविध लोकोपयोगी योजना यशस्वीपणे राबविणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे राजकारणातील ‘अपवाद’ म्हणावा असे आहेत. असे बुद्धीमान व्यक्तिम ...
आयआयटीयन मनोहर पर्रीकर यांनी आपल्या बुद्धिकौशल्याचा उपयोग विकासाद्वारे लोककल्याणासाठी करताना निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी व निष्कलंक चारित्र्य याचा आदर्श निर्माण केला आहे. पर्रीकरांमुळे आयआयटीमध्ये मिळणाऱ्या प्रगत व प्रगल्भ ज्ञानाला सामाजिक आशय प्राप् ...
मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री आणि आता संरक्षणमंत्री म्हणून सर्वपरिचित असले तरी सामान्य व्यक्तीला त्यांचं रोज रोज दर्शन कुठलं? शालेय जीवनापासून आजपर्यंत माझ्या त्यांच्याशी अगदी ओझरत्या अशा तीन भेटी झाल्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं माझ्यावर एक वेगळ ...
विक्रम आणि वेताळ कथांत राजा विक्रम न थकता जंगलात जाऊन वेताळाला पाठीवर मारून पुन्हा वाट चालू लागतो. मिशन सालसेतबाबत मनोहर पर्रीकरांनीही तेच केले. पूर्वी मिशन सालसेतने तीन चार वेळा हात पोळूनही त्यांनी २0१२ साली त्याला पुन्हा हात घातला आणि आश्चर्य म्हणज ...
मनोहर पर्रीकरांचा शब्द कार्यकर्त्यांसाठी अखेरचा. त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. आपले बावनकशी नेतृत्व सिद्ध करतानाच त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली, त्यांच्या विचारांना एक दिशा दिली. त्यांच्या या संघटनकौशल्याने जो झंझावात निर्माण ...
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी र्पीकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेकांना आठवल्या. गेले वर्षभर कॅन्सरशी झुंजल्यानंतर व प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आजारपणातही गोव्याची चिंता वाहिलेला हा नेता शेवटी धारातीर्थी पडला ...