मंत्रालयात आणि अधिवेशनादरम्यान विधानभवनात येट्स दाम्पत्य वावरताना दिसते. आपल्याला आमदारकीची पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून डेस्मंड कायम धडपडत अन् त्यांच्या पत्नी नीलिमा सावलीसारख्या त्यांच्यासोबत असत. ...
मुंबई पोलिसांच्या ऐतिहासिक पोलीस नोंदीचे जतन करणे तसेच पोलीस म्युझिअमसाठी मुंबई पोलिसांच्या मुंबई पोलीस प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला. त्यामुळे हे मुंबईतील आधुनिक पोलीस संग्रहालय ठरणार आहे. ...
मुंबई ते लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. ...
शेती आणि शेतकरी हा शासनाचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. तो बँकांचाही प्राधान्यक्रमाचा विषय व्हावा. बँकांनी शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी पतपुरवठा करताना अधिक लक्ष केंद्रित करावे, उद्दिष्टाच्या साध्यासाठी लक्ष्याधारित योजना आखावी, अशा सूचना मुख्यमंत्री द ...
शेतक-यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व दूध व्यवसाय टिकविण्याचे कारण देत शासनाने राज्यातील दूध भुकटी उत्पादकांना प्रति लिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही जिल्हे तापलेलेच असून गुरुवारी सांयकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापुरला वादळी वा-यासह वळवाच्या पावसाने झोडपले काही ठिकाणी गाराही पडल्या. पावसाने तिघांचे बळी घेतले. ...
तमाम पक्ष बदलू नेते हो, आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो, आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत. ...