विधानसभा निवडणुकीचे काम संपताच कृषी खात्याची यंत्रणा बोगस विमा क्षेत्र शोधण्यात गुंतली असून, राज्यातील सात-आठ जिल्ह्यांत कांदालागवड न करता विमा भरलेले बनावट क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. ...
फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत पोहोचले आहे. कांदा लागवड कालावधी कधी अन् किती?, विमा भरलाय कधी अन् किती?, याच्या आकडेवारीचा मेळ लावण्यासाठी कृषी खात्याला डोके खाजविण्याची वेळ आली आहे. ...
कृषी आयुक्तालयाच्या पुढाकारामुळे बोगस अर्ज अपात्र करण्यात आले असून शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे काम चालू आहे. कृषी विभागाच्या या कामामुळे शासनाचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत. ...
यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे. ...
हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...