शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक , शिवसेनेची आज कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:47 AM

जवळपास साडेतीन वर्षांनी स्थापन होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेवर काहीही झाले तरी झेंडा फडकावण्यासाठी आसुसलेल्या शिवसेनेची सोमवारी कसोटी लागणार असून राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहण्यावरच

ठाणे : जवळपास साडेतीन वर्षांनी स्थापन होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेवर काहीही झाले तरी झेंडा फडकावण्यासाठी आसुसलेल्या शिवसेनेची सोमवारी कसोटी लागणार असून राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहण्यावरच या निवडणुकीची सारी गणिते अवलंबून आहेत. त्यासाठी शहापूर तालुक्यात राष्ट्रवादीला न मागता उपसभापतीपद देऊन शिवसेनेने मोठी किंमत चुकवली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने केलेल्या महायुतीनंतर निकाल जरी विरोधात गेला असला, तरी सभापतीपद मिळेपर्यंत भाजपाने जंग जंग पछाडत शिवसेनेची जमेल तेवढी कोंडी करत त्याचे उट्टे काढल्याचे दिसून आले.जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी, १५ जानेवारीला होणार असून त्यात दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेचे सदस्य थेट महाबळेश्वरहून तर भाजपाचे सदस्य गोव्याहून येणार आहेत. अध्यक्षपद शिवसेनेच्या शहापूर पंचायत समितीच्या माजी सभापती मंजुषा जाधव यांना, तर राष्टÑवादीचे मुरबाड येथील सुभाष पवार यांना उपाध्यक्षपद मिळेल, असे मानले जाते. त्यामुळे आदिवासी आणि कुणबी अशा दोन्ही समाजांना सत्तेत स्थान मिळेल. भिवंडीने भाजपाला जसा हात दिला, तसाच शिवसेनेलाही दिला. त्यामुळे त्या तालुक्यालाही चांगले पद मिळावे, अशी तयारी सुरू आहे. बाळ्यामामा यांना गटनेतेपद देत शिवसेनेने ती कसर अधीच भरून काढली आहे.अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड नियोजन भवनात पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज तीन वाजेपर्यंत दाखल करता येतील. दुपारी ४.३० पर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर तासाभरात ही निवड पार पडेल.ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांपैकी शिवसेनेचे २५ सदस्य आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या १० सदस्यांचा पाठिंबा मिळाला, की सत्तेचे गणित सोपे होईल. त्यासाठी अध्यक्षपद शिवसेनेकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे अशी विभागणी आहे.राष्ट्रवादीला अध्यक्षपदासह अन्य काही समित्या देण्याची तयारी दाखवत भाजपाने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिवसेनेनेही शहापुरात राष्ट्रवादीशी मिळतेजुळते घेतले. तसेच त्यांना आणखी काही समित्या देण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे.भाजपाच्या फोडाफोडीच्या काळात काँग्रेसच्या एकमेव सदस्याला महत्त्व आले होते. पण राष्ट्रवादीशी तडजोड केल्याने त्या सदस्याची भूमिका पूर्वीइतकी निर्णायक ठरणार नाही. अर्थात तो सदस्य भाजपासोबत जाणार नाही, असे वरिष्ठ नेते सांगत असल्याने शिवसेनेसाठी हा दिलासा मानला जातो.आपले १६ सदस्य, एक पुरस्कृत अपक्ष आणि काँग्रेसचा एक सदस्य अशा १८ सदस्यांना हाताशी धरून राष्ट्रवादीच्या १० सदस्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपाने थांबवल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना गळ घालून हे प्रयत्न सुरू होते.शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दोन मतांची गरज होती आणि भिवंडीतील नेते तसे जाहीरपणे सांगत होते. मुरबाडमधील राष्ट्रवादीचे सदस्य भाजपासोबत जाण्यास नाखूश होते. शिवाय उपसभापतीपद दिल्याने शहापुरातील पाचही सदस्यांची मते मिळतील अशी बेगमी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे भाजपाने आपले प्रयत्न आवरते घेतल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना