शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

गरब्यामध्ये तरुणाईचा सळसळता उत्साह, दिवसा अभ्यास, रात्री फेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 00:48 IST

आचारसंहितेमुळे नवरात्रोत्सवात राजकीय बॅनरबाजी गायब असली, तरी तरुणाईमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. शहरात विविध मंडळांच्या गरबा, दांडियांंचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : आचारसंहितेमुळे नवरात्रोत्सवात राजकीय बॅनरबाजी गायब असली, तरी तरुणाईमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. शहरात विविध मंडळांच्या गरबा, दांडियांंचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षांचा काळ असला, तरी विद्यार्थी दिवसभर अभ्यास करून गरब्यासाठी खास वेळ काढत आहेत. गरब्याला बॉलिवूड-टीव्ही मालिकांचे कलाकार, गायक हजेरी लावत असून त्यांना पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रित करताना आयोजकांची दमछाक होत असून शनिवारी, रविवारी सुटी असल्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी आयोजक खास नियोजन करण्यात गुंतल्याचे दिसत आहेत.गरबा खेळण्यासाठी तरुण-तरुणी खास पेहराव करून येत आहेत. शाळा-कॉलेजच्या परीक्षा सुरू असल्या तरी त्यांचा उत्साहावर काहीच परिणाम झालेला नाही. दिवसा अभ्यास आणि रात्री गरबा असे अभ्यासाचे वेळापत्रकच बनवले असल्याचे तरुण-तरुणी सांगत आहेत. अदिती ठक्कर म्हणाली की, आमची परीक्षा सुरू आहे. दिवसभर अभ्यास करतो आणि रात्री गरब्यासाठी वेळ काढतो. त्यामुळे अभ्यासही होतो आणि गरब्याचा आनंदही लुटता येतो. अभ्यास केल्यामुळे पालकही दांडिया खेळण्यापासून रोखत नाही. त्यामुळे परीक्षा आणि पाऊस या दोन्हींचा गरबाप्रेमींवर काहीच परिणाम झाला नाही.बड्या मंडळांच्या गरब्याला जास्त गर्दी होत असल्याने छोट्या मंडळांकडील ओघ कमी झाला असल्याचे काही मंडळांचे म्हणणे आहे. मोठ्या मंडळांतर्फे आयोजित दांडियाला गर्दी होत असल्याने अनेकांना प्रवेश नाकारला जात असल्याने आल्यापावली परत फिरावे लागत आहे. त्यामुळे काही गरबाप्रेमी पैसे घ्या पण प्रवेश द्या, असे सांगत आहेत. डोंबिवलीत बड्या गरब्यासाठी बाहेरूनही तरुण-तरुणी येत असून त्यांना रेल्वेस्थानकात इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षा मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच, गरब्याच्या परिसरात वाहतूककोंडीही होत आहे. स्वयंसेवकांनी काही दांडियाप्रेमींना आत सोडत गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. भगवती भानुशाली यांना एका ठिकाणाहून प्रवेश न मिळाल्याने परतावे लागले.काही ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त पाककला, रांगोळी, मेहंदी अशा विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच गरब्यामध्ये महिला आणि मुलींनाच प्रवेश दिला जातो. येथे ओळखीतल्या पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. १० वाजेपर्यंतच गरब्याला परवानगी असली, तरी वेळेचे बंधन पाळूनही गरबाप्रेमी आनंद लुटताना दिसत आहेत. डोंबिवलीतील एका मंडळाने यंदा गरबा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गरब्यावर होणाऱ्या खर्चाच्या पैशांतून पूरग्रस्त भागातील आदिवासीपाड्यांवरील दोन शाळांना मदत केली जाणार असल्याचे या मंडळाच्या गौरांग पाटणकर यांनी सांगितले.दांडिया गायब, गरब्याचीच धूमनवरात्रोत्सव म्हटले की, सर्वप्रथम दांडिया आठवतो. पण, यंदा सर्वत्र गरब्याचीच धूम अधिक आहे. त्यामुळे गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई गरबा खेळताना दिसत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीthaneठाणे