शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

येवा कोविड सेंटर आपलाच असा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेने पाच हजार ४४८ खाटांची व्यवस्था केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेने पाच हजार ४४८ खाटांची व्यवस्था केली. त्यापैकी चार हजार २०६ खाटा सध्या रिकाम्या आहेत. लाट ओसरल्यामुळे ठाणेकरांकरिता ही सुविधा सुरू राहावी व यदाकदाचित तिसरी लाट आलीच तर पुन्हा जमवाजमव करण्याची नामुश्की आरोग्य विभाग व महापालिका यांच्यावर येऊ नये याकरिता होम क्वारंटाईन सुविधा बंद करून प्रत्येक कोरोना रुग्णांवर लक्षणे नसतानाही येथे दाखल होण्याची सक्ती केली आहे.

दि. ६ एप्रिल २०२१ रोजी ठाणे शहरात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक १८८३ रुग्ण एका दिवसात आढळले होते. त्या दिवशी ठाण्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांकरिता ८२८ खाटा उपलब्ध होत्या. मात्र ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध नव्हते. त्या दिवशी ठाण्यात महापालिका व खासगी इस्पितळात उपचार घेणाऱ्यांची संख्या १२ हजार ९८३ होती. परंतु त्याचवेळी लक्षणे नसलेले नऊ हजार २८१ रुग्ण होम क्वारंटाईन होते. राज्य शासनाचा होम क्वारंटाईन सुविधा बंद करण्याचा निर्णय तिसऱ्या लाटेत कायम राहिला तर ठाण्यात २२ ते २५ हजार रुग्णांची सुविधा निर्माण करावी लागेल. म्हणजे सध्याच्या व्यवस्थेच्या चौपट वैद्यकीय सुविधांची तयारी करावी लागेल.

शासनाने ठाण्यासह १८ जिल्ह्यांत होम क्वारंटाईन बंद केले. कळवा येथे म्हाडाच्या माध्यमातून ४०० आणि मुंब्य्रात ४१० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. बुश कंपनीच्या ठिकाणी ६०० खाटांचे, बोरीवडे येथे ३००, व्होल्टास कंपनी येथे एक हजार खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ग्लोबल येथील ११०० आणि पार्किंग प्लाझा येथील ११०० खाटा उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत. ठाण्यात सध्या तब्बल ५ हजार ४४८ बेड असून, त्यातील ४ हजार २०६ बेड रिकामे आहेत. भाईंदरपाडा आणि चार हॉटेल मिळून क्वारंटाईनचे ८९५ बेड उपलब्ध आहेत. भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन केंद्रात एक हजार बेडची व्यवस्था करता येईल. पहिल्या लाटेतही ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील अशा रुग्णांसाठी मानपाडा येथील रेंटलची इमारत, काही शाळांमध्ये १ ते २ हजार बेड उपलब्ध करून देण्यात आले होते. होम क्वारंटाईन बंद केल्यानंतर रुग्णवाढ झाली तर महापालिका पुन्हा अशा पद्धतीने क्वारंटाईन केंद्र तत्काळ उभारू शकते, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

दरम्यान, ठाण्यात एप्रिलच्या पहिल्या २५ दिवसांत रुग्णवाढीचा दर अधिक होता. रोजच्या रोज दोन हजारांच्या आसपास रुग्ण आढळत होते. दि. ६ एप्रिल रोजी ठाण्यात सर्वाधिक १८८३ रुग्ण शहरात आढळले होते. त्यावेळी रुग्णांना बेड मिळविण्यासाठी किंवा ज्यांना सौम्य लक्षणे होती अशा रुग्णांसाठी विलगीकरण केंद्रातही खाटा उपलब्ध होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता. याच दिवशी शहरात ४ हजार १२२ खाटांपैकी ३ हजार २९४ खाटा फुल्ल होत्या. केवळ ८२८ खाटा शिल्लक होत्या. परंतु गंभीर रुग्णांकरिता नातलगांना धावाधाव करावी लागत होती. याच दिवशी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ९८३ एवढी होती, तर होम क्वॉरंटाईन रुग्णांची संख्या ९ हजार २८१ एवढी होती.

सध्यादेखील होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या ही ६७८ आहे, तर एकूण बेडची संख्या ५ हजार ४४८ एवढी आहे. त्यामुळे घरी राहू नका, महापालिकेच्या सुविधेचा वापर करा, असा आरोग्य विभागाच्या निर्णयाचा हेतू आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत होम क्वारंटाईन सुविधा बंद ठेवली तर २२ ते २५ हजार रुग्णांची व्यवस्था कशी करणार, असा सवाल केला जात आहे.

.........