शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

घरे तोडल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 21:12 IST

ठाणे : हरित पट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे ...

ठळक मुद्देघरे तोडण्याची कारवाई वेळीच थांबवण्याची मागणी२७ नोव्हेबरला भिवंडीतील सर्व गोडाऊन बंद करण्याची घोषणाभुकेने मृत्युमुखी पडणाऱ्या जगातल्या १०० बालकांमध्ये ५० बालके भारतात आहेत हे आपल्या जगभर फिरणाऱ्या पंतप्रधानांना सांगितले पाहिजे

ठाणे : हरित पट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. हा अन्याय असल्याचा आरोप करून त्याविरोधात शेकडो आदिवासींनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच थांबवण्याची मागणी केली.     जिल्हातील भिवंडी , शहापूर , कल्याण , अंबरनाथ , मुरबाड व ठाणे भागातील आदिवासींची घरे तोडली जात आहेतत. त्याविरोधात शेकडो श्रमजीवी आदिवासींनी एकत्र येऊन हा भव्य मोर्चा काढून प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर श्रमजीवीच्या या मोर्चाचे सभेत सुरूपांतर झाले. यावेळी उन्हात असलेल्या व्यासपीठावर पंडीत यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील, माजी आमदार रूपेश म्हात्रे, टीडीसीसीचे माजी अध्यक्ष आर.सी. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. या बि-हाड मोर्चात सर्वाधिक संख्येने आदिवासी महिलांचा समावेश आढळून आला. कोंबड्या, बकऱ्या, भांडी, आदीं घेऊन हा बि-हाड मोर्चा श्रमजीवीने काढला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.      भिवंडी तालुक्यात प्रथम झालेल्या या कारवाईत आदिवासींचे घरे मोठ्याप्रमाणात तोडण्यात आली. मात्र भिवंडीतील गोडाऊनही तोडण्याचे आदेश असताना त्यावर मात्र कारवाई न करता प्रथम आदिवासींचे जुने व परंपरागत असलेले घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाने केली. या अन्याया विरोधात मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच बंद करण्याची मागणी या आदिवासीं मोर्चेकरांनी केली. त्यांच्या या मोर्चाव्दारे आता गोडाऊन तोडण्याची कारवाई देखील थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मुळच्या आदिवासीं, गरीब सामान्य असलेल्या एकाही गरिबाला उद्धवस्त होऊ देणार नाही असे पंडित यांनी यावेळी मोर्चेकरांना मार्गदर्शन करतेवेळी स्पष्ट केले. २०१५ पर्यंतच्या बांधकामांना नियमांकुल करण्याची मागणी यावेळी त्यांनी लावून धरली.     भारताच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण होत आहेत असे असताना आज गरिबांची मुलं भुकेने मरत आहेत, यापेक्षा दुर्दैवी काय आहे असा सवाल पंडित यांनी विचारला. भुकेने मृत्युमुखी पडणाऱ्या जगातल्या १०० बालकांमध्ये ५० बालके भारतात आहेत, हे आपल्या जगभर फिरणाऱ्या पंतप्रधानांना सांगितले पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कातकरी समाज आजही वेदनादयी जीवन जगत आहे, कातकरी उत्थान सुरू केले मात्र सर्व काही फक्त कागदावर आहे. २०२० पर्यंत सर्वांना घर देणारे आता लोकांची घरे झोपड्या तोडत आहेत.ही तर लोकशाहीची थट्टा मांडल्याचेही त्यांनी सांगितले.   

      यावेळी रूपेश म्हात्रे यांनी ही मार्गदर्शन करून या अन्याया विरोधात २७ नोव्हेबरला भिवंडीतील सर्व गोडाऊन बंद करण्याची घोषणा केली.या मोर्चात कार्यध्यक्ष केशव नानकर, , उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, रामराव लोंढे, गणपत हिलीम, हिरामण गुळवी, राजेश चन्ने, दशरथ भालके, प्रमोद पवार, जया पारधी, संगीता भोमटे, जयेंद्र गावित, गणेश उंम्बरसडा, उल्हास भानुशाली आदी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMorchaमोर्चा