शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन

By नितीन पंडित | Updated: April 4, 2024 17:51 IST

भिवंडी तालुक्यात असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

नितीन पंडित, भिवंडी: तालुक्या तील असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या कातकरी घटकाचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ महिलांनी मालबीडी सूर्यानगर ग्रामपंचायती वर एका हाती हंडा, एका हाती दांडा या मोर्चाचे आयोजन गुरुवारी केले होते.या आंदोलनात तालुका पदाधिकारी भूषण घोडविंदे,नवनाथ भोये, सुरेश रावते,इंद्रसेन ठाकरे,सागर जाधव, अक्षय वाघे यांसह गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात कोट्यावधी रुपये खर्च करून जलजिवन मिशन अंतर्गत हर घर नळ हर घर जल ही योजना राबविण्यास घेतली.परंतु दोन वर्षांहून अधिक काळ झाला तरी बहुतांश गावातील योजना आज ही अपूर्ण आहेत.तर अनेक गावातील कामे ठेकेदारांनी अत्यंत हलक्या दर्जाची कुचकामी ठरणारी केली असल्याचा आरोप होत आहे.तालुक्यातील मालबिडी सुर्यानगर या गावासाठी २०२० मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर झाली परंतु तीन वर्षाची मुदत संपून ही गावातील कुटुंबीयांना नळाद्वारे पाणी उपलब्ध झाले नसून बोअरवेल मधून सुध्दा उन्हाळ्यात पाणी येत नसल्याने गावातील कुटुंबीय तहानलेले आहेत असा आरोप श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित यांनी केला आहे.

या गावातील योजना ही पुढील तीस वर्षांसाठी कार्यान्वित राहणार आहे परंतु त्यासाठी पाईप लाईन अवघी एक फूट खोल असल्याने ती कधी ही उखडू शकते ,कोट्यावधी रुपये खर्च करूनही ही योजना कार्यान्वित करण्यात पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग व संबंधित ठेकेदार अपयशी ठरल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी असून त्याच साठी गावातील महिला एका हाती हंडा तर एका हाती दांडा असे अभिनव आंदोलन केल्याची माहिती जयेंद्र गावित यांनी दिली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीWaterपाणीStrikeसंप