शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम रखडले, खासदारांनी अधिकाऱ्यांची घेतली पालिकेत ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:08 IST

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रखडलेल्या कामांना जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची शुक्रवारी अंबरनाथ पालिकेत शाळा भरवण्यात आली होती.

अंबरनाथ : कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रखडलेल्या कामांना जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची शुक्रवारी अंबरनाथ पालिकेत शाळा भरवण्यात आली होती. रस्त्याचे काम रखडण्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयांची खरडपट्टी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या बैठकीत अधिकारी आपली चूक लपवण्यासाठी दुसºया विभागाच्या अधिकाºयांकडे बोट दाखवत होते. अखेर, खासदारांनी सर्वच अधिकाºयांना आपले काम जबाबदारीने करण्याचे आणि रस्त्याच्या कामाच्या आड येणाºया समस्या सोडवण्याचे आदेश दिले.कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएकडून केले जात आहे. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणात जमिनीखाली असलेल्या जल आणि वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचा विषय ही मुख्य समस्या झाली आहे. या वाहिन्या जोपर्यंत स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करणे शक्य नाही. त्यातच ज्या सरकारी यंत्रणेच्या वाहिन्या रस्त्याच्या आड येत आहेत, त्या विभागातील अधिकारी आपली जबाबदारी सांभाळत नसल्याने या कामाला आणखी विलंब होत आहे.या रस्त्याच्या कामासंदर्भात येणाºया अडचणींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खासदार शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबरनाथ नगरपालिका, जीवन प्राधिकरण, महावितरणच्या अधिकाºयांची बैठक झाली.रस्त्याच्या अडचणीत या अधिकाºयांकडून एकत्रित काम केले जात नसल्याने रस्त्याचे काम रखडल्याने ही बैठक घेण्याची वेळ आली. यावेळी सर्वच विभागांनी आपल्या समस्या मांडत बाजू मांडली. तर, या बैठकीत सर्वाधिक रोष हा एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर दिसत होता.जोपर्यंत जमिनीखालील विविध वाहिन्या स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत काम करणे शक्य नसल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. तो प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यावर त्याचे काम करणे शक्य होणार आहे.या समस्यांवर तोडगा काढत असताना प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचे आणि वाढीव प्रस्तावाला मंजुरी घेण्याचे आदेश खासदारांनी दिले. तसेच रस्त्याचे काम करताना सर्वच विभागांच्या अधिकाºयांनी आपली जबाबदारी सांभाळून सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. आता यंत्रणा कधी हालाचल करतात याकडे लक्ष लागले आहे.विनापरवानगी टाकल्या वाहिन्याकल्याण-बदलापूर रस्त्यावर ज्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, त्यातील काही वाहिन्या टाकण्याची परवानगी दिलेली नाही. परवानगी नसताना वाहिन्या टाकल्याने कंत्राटदाराने त्या वाहिन्या वरच्यावर टाकल्या आहेत. त्यामुळे रस्त्यासाठी खोदकाम करणे शक्य होत नसल्याचे समोर आले आहे.परवानगीला विलंब लावू नकारस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी गरजेची आहे. मात्र, ती परवानगी उशिराने मिळत असल्याने कामात अडथळा येत असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात खासदारांनी वाहतूक विभागालाही परवानगीला विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक